शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नव्या शासन आदेशातही शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: April 1, 2016 03:00 IST

शासनाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ च्या शासकीय आदेशात राज्यातील १५ हजार ७४७ गावांचा समावेश केला होता.

याचिकाकर्त्यांचा आरोप :पीककर्ज न भरण्याचे आवाहनयवतमाळ : शासनाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ च्या शासकीय आदेशात राज्यातील १५ हजार ७४७ गावांचा समावेश केला होता. यामध्ये जिल्ह्यातील केवळ दोन गावांचा समावेश होता. याबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर आता शासनाने विदर्भातील ११ हजार ८६२ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये नव्याने समावेश केला आहे. परंतु नव्या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि शासनावर आर्थिक भार पडणारे मुद्दे डावलून शासनाने एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य आणि याचिकाकर्ते देवानंद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाने राज्यातील दुष्काळी गावांची यादी नव्याने तयार करून तसे शुद्धीपत्रक काढण्याचे आदेश शासनाला दिले. शासनाने आदेश तर काढले, परंतु २३ मार्च २०१६ चा आदेश त्याच दिवशी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आला नाही. आदेशातील अन्यायकारक मुद्यांवर पवार यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार बँकांकडून सध्या शेतकऱ्यांची जी अवाजवी वसुली सुरू आहे, ती रोखण्याचे आदेश नव्या जीआरमध्ये नाही. कर्जाच्या पुनर्गठणाचा मुद्दा नाही, कोरडवाहू शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार आठशे रुपये मिळायला पाहिजे, पीकविम्यामध्ये विरोधाभास असलेले पीक दाखविले आहे आणि निविष्ठा अनुदानासाठी मदतीचे आदेश काढलेले नाही. हे सर्व अन्यायकारक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पवार म्हणाले. दुष्काळी गावांसाठी ३१ डिसेंबर २०१५ रोजी निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्याला ३२८ कोटी ८५ लाख रुपये मिळाले. ही बाब लक्षात घेता आणि यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी गावांची संख्या पाहता किमान पाचशे कोटी यवतमाळ जिल्ह्याला मिळणे आवश्यक असल्याचेही पवार म्हणाले. राज्य शासनाने नव्याने काढलेला जीआरही अन्यायकारक असून या अन्यायकारक आदेशाविरुद्ध आपण पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले शिवाय शेतकऱ्यांनी आपल्याकडील पिककर्ज न भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)