शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

नव्या शासन आदेशातही शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: April 1, 2016 03:00 IST

शासनाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ च्या शासकीय आदेशात राज्यातील १५ हजार ७४७ गावांचा समावेश केला होता.

याचिकाकर्त्यांचा आरोप :पीककर्ज न भरण्याचे आवाहनयवतमाळ : शासनाने दुष्काळग्रस्त गावांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ च्या शासकीय आदेशात राज्यातील १५ हजार ७४७ गावांचा समावेश केला होता. यामध्ये जिल्ह्यातील केवळ दोन गावांचा समावेश होता. याबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर आता शासनाने विदर्भातील ११ हजार ८६२ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये नव्याने समावेश केला आहे. परंतु नव्या जीआरमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे आणि शासनावर आर्थिक भार पडणारे मुद्दे डावलून शासनाने एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य आणि याचिकाकर्ते देवानंद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाने राज्यातील दुष्काळी गावांची यादी नव्याने तयार करून तसे शुद्धीपत्रक काढण्याचे आदेश शासनाला दिले. शासनाने आदेश तर काढले, परंतु २३ मार्च २०१६ चा आदेश त्याच दिवशी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आला नाही. आदेशातील अन्यायकारक मुद्यांवर पवार यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार बँकांकडून सध्या शेतकऱ्यांची जी अवाजवी वसुली सुरू आहे, ती रोखण्याचे आदेश नव्या जीआरमध्ये नाही. कर्जाच्या पुनर्गठणाचा मुद्दा नाही, कोरडवाहू शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार आठशे रुपये मिळायला पाहिजे, पीकविम्यामध्ये विरोधाभास असलेले पीक दाखविले आहे आणि निविष्ठा अनुदानासाठी मदतीचे आदेश काढलेले नाही. हे सर्व अन्यायकारक मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पवार म्हणाले. दुष्काळी गावांसाठी ३१ डिसेंबर २०१५ रोजी निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार बुलडाणा जिल्ह्याला ३२८ कोटी ८५ लाख रुपये मिळाले. ही बाब लक्षात घेता आणि यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी गावांची संख्या पाहता किमान पाचशे कोटी यवतमाळ जिल्ह्याला मिळणे आवश्यक असल्याचेही पवार म्हणाले. राज्य शासनाने नव्याने काढलेला जीआरही अन्यायकारक असून या अन्यायकारक आदेशाविरुद्ध आपण पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले शिवाय शेतकऱ्यांनी आपल्याकडील पिककर्ज न भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)