शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

साहित्य संमेलनातून नवीन ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:21 IST

आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : उमरखेडमध्ये आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतउमरखेड : आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले. त्या शनिवारी येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.कोरेगाव-भीमा शौर्य दिन द्विशतकपूर्तीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकरी प्रबोधन पर्व समिती व दिशा सामाजिक संस्था उमरखेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खासदार हरिहरराव सोनुले साहित्यनगरी व सत्यशोधक भाऊसाहेब माने विचारमंच येथे दोन दिवसांचे हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या उद्घाटपर भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे साहित्य संमेलन ही नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचे असून ती काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. शासनाकडून मराठी भाषेला न्याय मिळत नसल्याने सर्वांनी मिळून मराठी भाषा वाचविण्यासाठी लढा उभा करण्याची गरज प्रतिपादीत केली. आपल्या ४५ मिनीटांच्या भाषणात त्यांनी साहित्य क्षेत्रातील नामवंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या साहित्य संमेलनातून मी नवीन ऊर्जा घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष आनंद गायकवाड उपस्थित होते. मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. विजय माने, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वॉजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया व विजयराव खडसे, डॉ.आरती फुफाटे, देवानंद पवार, सभापती प्रवीण मिरासे, नगराध्यक्ष नामदेव ससाने, वसंतराव घुईखेडकर, अ‍ॅड. आशिष देशमुुख, ययाती नाईक, डॉ. अंकुश देवसरकर आदी उपस्थित होते.संचालन विलास भवरे, प्रास्ताविक अनिल काळबांडे यांनी केले. आभार प्रेम हनवते यांनी मानले. या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.शासनाचा केला निषेधमहाराष्ट्र शासनाने १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मराठीचे अस्तित्वच संपविण्याचा हा प्रकार आहे. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यानी मराठी भाषेचा अपमान सहन केला नसता. त्यांची खूप उणीव भासत आहे, असे प्रांंजळ मनोगत खासदार सुळे यांनी व्यक्त केले. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध त्यांनी शासनाचा जाहीर निषेध केला. तसेच साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव पारित करण्याची सूचनाही केली.