शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

साहित्य संमेलनातून नवीन ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:21 IST

आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : उमरखेडमध्ये आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतउमरखेड : आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले. त्या शनिवारी येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.कोरेगाव-भीमा शौर्य दिन द्विशतकपूर्तीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकरी प्रबोधन पर्व समिती व दिशा सामाजिक संस्था उमरखेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खासदार हरिहरराव सोनुले साहित्यनगरी व सत्यशोधक भाऊसाहेब माने विचारमंच येथे दोन दिवसांचे हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या उद्घाटपर भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे साहित्य संमेलन ही नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचे असून ती काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. शासनाकडून मराठी भाषेला न्याय मिळत नसल्याने सर्वांनी मिळून मराठी भाषा वाचविण्यासाठी लढा उभा करण्याची गरज प्रतिपादीत केली. आपल्या ४५ मिनीटांच्या भाषणात त्यांनी साहित्य क्षेत्रातील नामवंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या साहित्य संमेलनातून मी नवीन ऊर्जा घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष आनंद गायकवाड उपस्थित होते. मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. विजय माने, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वॉजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया व विजयराव खडसे, डॉ.आरती फुफाटे, देवानंद पवार, सभापती प्रवीण मिरासे, नगराध्यक्ष नामदेव ससाने, वसंतराव घुईखेडकर, अ‍ॅड. आशिष देशमुुख, ययाती नाईक, डॉ. अंकुश देवसरकर आदी उपस्थित होते.संचालन विलास भवरे, प्रास्ताविक अनिल काळबांडे यांनी केले. आभार प्रेम हनवते यांनी मानले. या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.शासनाचा केला निषेधमहाराष्ट्र शासनाने १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मराठीचे अस्तित्वच संपविण्याचा हा प्रकार आहे. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यानी मराठी भाषेचा अपमान सहन केला नसता. त्यांची खूप उणीव भासत आहे, असे प्रांंजळ मनोगत खासदार सुळे यांनी व्यक्त केले. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध त्यांनी शासनाचा जाहीर निषेध केला. तसेच साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव पारित करण्याची सूचनाही केली.