शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्वतंत्र विदर्भासाठी नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता

By admin | Updated: May 1, 2016 02:35 IST

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक या विदर्भाच्या पुत्रांनी महाराष्ट्रासाठी काम केले.

श्रीहरी अणे : १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकविणार, पुसद येथे पत्रकार परिषदपुसद : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक या विदर्भाच्या पुत्रांनी महाराष्ट्रासाठी काम केले. परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी काहीच केले नाही, असा आरोप करीत स्वतंत्र विदर्भासाठी नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड़ श्रीहरी अणे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केले. येथील विश्राम भवनावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात झालेल्या पत्रपरिषदे अ‍ॅड़ श्रीहरी अणे यांनी वेगळ््या विदर्भाबाबत आपली भूमिका विषद केली. स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न दोन-तीन वर्ष नेटाने रेटून धरावा लगेल. तेव्हाच भाजप वेगळ््या विदर्भाच्या बाबतीत विचार करेल. समजा भाजपाने स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर यु-टर्न घेतला तर भाजपाच्या विरोधात जाण्याची तयारी आहे. दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्र राज्याला मान्यता घ्यावी लागते. राज्याच्या ठरावाची आवश्यकता नसते. तेव्हा भाजपाने शिवसेना आणि मनसेकडे लक्ष देऊ नये, असे ते म्हणाले. वेगळा विदर्भ राज्य करण्यासाठी भाजपाला बाध्य करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत १ मे रोजी २० गावात वेगळ््या विदर्भाचा झेंडा फडकविणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेगळा मराठवाडा झाला पाहिजे या मताशी मी आजही ठाम आहे. जालना येथील जाहीर सभेत अ‍ॅड़ देशमुख व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे उगाडे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री विदर्भाला भरभरून देत आहे आणि आता वेगळा विदर्भ देणार नाही, असे सांगितले. त्यावर आपण त्यांच्या मताचे खंडन करत असताना मराठवाड्याचा विकास करावयाचा असेल तर वेगळा मराठवाडा झाला पाहिजे, यासाठी स्थानिक नेतृत्वाची गरज आहे. प्रथम नेतृत्व उभे करावे लागेल असे आपण म्हटल्याचे अ‍ॅड़ अणे यांनी सांगितले. पुसद जिल्हा निर्मितीबाबत आपले मत काय, असे विचारले असता ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात लहान-लहान जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. तेव्हा वेगळ््या विदर्भासाठी नवीन जिल्हे होणे आवश्यक आहे. पुसद जिल्हा निर्मितीसाठी आमचे पूर्ण समर्थन असेल, पुसदसोबत आणखी दोन-चार जिल्हे विदर्भात होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नॅशनल फेडरेशन आॅफ न्यू स्टेटस् या महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अ‍ॅड़ श्रीहरी अणे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे बुंदेलखंडची मागणी करणारे राजा बुंदेला हे या महासंघाचे कार्याध्यक्ष आहे. यापुढे विदर्भ व बुंदेलखंडची संयुक्त लढाई दिल्लीत लढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वसंतराव पाटील, नारायण क्षीरसागर, राजाभाऊ देशमुख, ज्ञानेश्वर तडसे, श्याम जोशी, गजानन वायकुळे, नारायण पाटील, दिगंबर पुंडे, नरेंद्र शुक्ला उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)