शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

जिल्हाभर उभारणार दूध संकलनाचे जाळे

By admin | Updated: June 6, 2015 01:40 IST

शासनाच्या विविध विभागाकडून शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. मात्र शासनाच्या

यवतमाळ : शासनाच्या विविध विभागाकडून शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. मात्र शासनाच्या योजना आतापर्यंत अपयशीच ठरल्या आहे. याउलट खासगी डेअरी चालकांनी उमरखेड व महागाव या तालुक्यांमध्ये यशस्वी प्रयोग राबवून दिवसाकाठी तब्बल २२ हजार लिटर दूध संकलन सुरू केले आहे. हाच पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाणार असून खास करून आत्महत्याग्रस्त तालुक्यांमध्ये याची प्रभावीपणे अमलबजावणी केली आहे. दुग्ध व्यवसायातून शेतीला हमखास उत्पन्नाची जोड देता येते. याची जाणीव शेतकऱ्यांत निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी दूध उत्पादन होऊनही केवळ बाजारपेठ नसल्याने त्याचे उत्पादन वाढविले जात नाही. नेमका हाच धागा पकडून तब्बल दोन वर्षांपूर्वी अमूल डेअरी या खासगी संस्थेने महागाव-उमरखेडमध्ये ठिकठिकाणी दूध संकलन केंद्र उभारले. सुरूवातीला अर्धा ते एक लिटर दूध घेऊन येणाऱ्या व्यक्तीचेही दूध संकलित केले जाऊ लागले. हळूहळू या तालुक्यात दूध उत्पादनाविषयी जागृती निर्माण झाली. शासनाच्या एकाही योजनेचा लाभ न घेता आज या तालुक्याचे दूध उत्पादन दोन हजार ५०० लिटरवरून २२ हजार लिटर प्रती दिवस इतके झाले आहे. हाच बदल इतरही तालुक्यांमध्ये घडवून आणण्यासाठी खासगी दूध डेअरींची मदत घेतली जाणार आहे. रानडे डेअरीने नेर, राळेगाव, कळंब, बाभूळगाव या चार तालुक्यात संकलन केंद्र सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संयुक्त बैठक घेतली. गुरूवारी दुपारी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला खासगी डेअरींचे संचालक, आत्माचे संचालक, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी विस्तार उपस्थित होते. या संयुक्त बैठकीतून आता दुधाचे मार्केटिंग या विषयावर काम करण्याचा ठराव घेण्यात आला. प्रशिक्षक म्हणून उमरखेड व महागावमधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचाच उपयोग केला जाणार आहे. या शेतकऱ्यांना गुजरात येथे अभ्यास दौऱ्यासाठी यापूर्वीच नेण्यात आले होते. शिवाय आत्माच्या ‘स्वच्छ उत्पादन योजनेतून’ मिल्कींग मशीनचे वाटप केले जाणार आहे. शिवाय महाराष्ट्र जीवन ग्रामीण जीवनोन्नती मिशन, नाबार्ड यांच्याही योजनांचा लाभ घेण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)निकषांच्या जोखडात फसली योजना४दुग्ध उत्पादनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना निकषामुळे योजनांचा लाभ देता येत नाही. आणि निकषात बसणारे लाभार्थी स्वत:हूनच दुग्ध उत्पादनाबाबत इच्छुक नसतात. त्यामुळे बऱ्याच जणांनी योजनेतून मिळालेली जनावरे लगेच विकल्याची उदाहरणे आहेत. यातच ही योजना फसली. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबावातून यंत्रणेने काम केले. ------------------------------------------------पशुसंवर्धन समितीची बैठक उमरखेडमध्ये४जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन समितीची बैठक थेट उमरखेडमध्ये घेण्याचा निर्णय उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतला. या बैठकीच्या माध्यातूनही दूध उत्पादन वाढीसाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहे.