शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

‘नेट न्यूट्रेलिटी’ने इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा

By admin | Updated: April 25, 2015 02:01 IST

टेलिकॉम कंपन्यांनी वॉटस्अ‍ॅप, फेसबूक, मॅसेंजर यासारख्या अप्लीकेशनमुळे रेग्युलर कॉलिंग आणि एसएमएसवर परिणाम झाल्याचे सांगत ‘नेट न्यूट्रेलिटी’चा नवा फंडा आणला आहे.

यवतमाळ : टेलिकॉम कंपन्यांनी वॉटस्अ‍ॅप, फेसबूक, मॅसेंजर यासारख्या अप्लीकेशनमुळे रेग्युलर कॉलिंग आणि एसएमएसवर परिणाम झाल्याचे सांगत ‘नेट न्यूट्रेलिटी’चा नवा फंडा आणला आहे. मात्र यामुळे इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा येण्याचा धोका यवतमाळातील अनेक मोबाईल-इंटरनेट तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मोबाईल ग्राहकांनीही या ‘नेट न्यूट्रेलिटी’ला तीव्र विरोध दर्शवित ‘ट्राय’च्या (टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथेरिटी आॅफ इंडिया) वेबसाईटवर आपले आक्षेप नोंदविले आहेत. सध्या ‘नेट न्यूट्रेलिटी’ हा शब्द सगळीकडे गाजतो आहे. या अनुषंगाने टेलिकॉम कंपन्यांकडून दिशाभूलही होताना दिसत आहे. सध्या मोबाईल ग्राहकाने इंटरनेट कनेक्शन घेतल्यास त्याला वॉटस्अ‍ॅप, गुगल, स्नॅपडिल, टिष्ट्वटर, फेसबूक, यू ट्युब आदी सर्व अ‍ॅप्सचा वापर करता येतो. त्यासाठी एकदा डाटा पॅक रिचार्ज केल्यानंतर आणखी वेगळे पैसे मोजावे लागत नाही. या सर्व सेवांसाठी एकसारखीच स्पीड मिळते. पण आता काही टेलिकॉम कंपन्या इंटरनेट आझादीचा नवीन प्रकार आणू पाहात आहेत. त्याला ‘नेट न्यूट्रेलिटी’ हे गोंडस नाव दिले गेले आहे. त्यात काही सेवा या पूर्णत: मोफत असतील तर काहींसाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. त्याचप्रमाणे काही सेवेची स्पीड कमी असेल तर काहींची जास्त राहील. विशेष असे, या सर्व सेवेचे संपूर्ण अधिकार टेलिकॉम कंपन्यांकडे राहणार आहे. कदाचित फेसबूक, गुगलसाठी प्रत्येकी ३० रुपये, वॉटस्अ‍ॅपसाठी ७५ रुपये, फ्लिपकार्ट-अमॅझोनसाठी प्रत्येकी ५० रुपये तर न्यूज अ‍ॅपसाठी १० रुपये बेसिक चार्ज द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांचे इंटरनेट स्वातंत्र्य हिसकावले जाणार आहे. ग्राहकांनी यातील संभाव्य धोके लक्षात घेता आतापासूनच ‘नेट न्यूट्रेलिटी’ला तीव्र विरोध चालविला आहे. त्यातूनच आतापर्यंत ‘ट्राय’च्या माध्यमातून ‘नेट न्यूट्रेलिटी’ला विरोध दर्शविणारे दहा लाख आक्षेप सरकार दरबारी दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.या क्षेत्रातील अनेक एक्सपर्टनेही ‘नेट न्यूट्रेलिटी’ ग्राहकांच्या आर्थिक हिताच्यादृष्टीने परवडणारी नसल्याचे म्हटले आहे. मोबाईल कंपन्यांच्या दाव्यानुसार, कॉलिंग आणि एसएमएसच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी इंटरनेटचा डाटा वापर वाढल्याची आणि पर्यायाने टेलिकॉम कंपन्यांचा फायदा झाल्याची बाबही दुर्लक्षित करता येणार नसल्याचे एक्सपर्टने सांगितले. ‘नेट न्यूट्रेलिटी’च्या मुद्यावर सरकार गप्प आहे. ‘ट्राय’ने यावर ग्राहकांकडून आक्षेप मागविले आहेत. इंटरनेट-ओआरजी किंवा एअरटेल-झिरो यासारख्या योजना ग्राहकांना खूप आकर्षक वाटत असल्या तरी यात ग्राहकाचे स्वत:चे इंटरनेट स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती यवतमाळातील इंटरनेट एक्सपर्टने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ‘नेट न्यूट्रेलिटी’ला आपला विरोध असल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रवीशंकर सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी अथवा सरकारने आपली ठोस भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांना ‘ट्राय’च्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच केंद्र सरकार ‘नेट न्यूट्रेलिटी’बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)