शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

‘नेट न्यूट्रेलिटी’ने इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा

By admin | Updated: April 25, 2015 02:01 IST

टेलिकॉम कंपन्यांनी वॉटस्अ‍ॅप, फेसबूक, मॅसेंजर यासारख्या अप्लीकेशनमुळे रेग्युलर कॉलिंग आणि एसएमएसवर परिणाम झाल्याचे सांगत ‘नेट न्यूट्रेलिटी’चा नवा फंडा आणला आहे.

यवतमाळ : टेलिकॉम कंपन्यांनी वॉटस्अ‍ॅप, फेसबूक, मॅसेंजर यासारख्या अप्लीकेशनमुळे रेग्युलर कॉलिंग आणि एसएमएसवर परिणाम झाल्याचे सांगत ‘नेट न्यूट्रेलिटी’चा नवा फंडा आणला आहे. मात्र यामुळे इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा येण्याचा धोका यवतमाळातील अनेक मोबाईल-इंटरनेट तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मोबाईल ग्राहकांनीही या ‘नेट न्यूट्रेलिटी’ला तीव्र विरोध दर्शवित ‘ट्राय’च्या (टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथेरिटी आॅफ इंडिया) वेबसाईटवर आपले आक्षेप नोंदविले आहेत. सध्या ‘नेट न्यूट्रेलिटी’ हा शब्द सगळीकडे गाजतो आहे. या अनुषंगाने टेलिकॉम कंपन्यांकडून दिशाभूलही होताना दिसत आहे. सध्या मोबाईल ग्राहकाने इंटरनेट कनेक्शन घेतल्यास त्याला वॉटस्अ‍ॅप, गुगल, स्नॅपडिल, टिष्ट्वटर, फेसबूक, यू ट्युब आदी सर्व अ‍ॅप्सचा वापर करता येतो. त्यासाठी एकदा डाटा पॅक रिचार्ज केल्यानंतर आणखी वेगळे पैसे मोजावे लागत नाही. या सर्व सेवांसाठी एकसारखीच स्पीड मिळते. पण आता काही टेलिकॉम कंपन्या इंटरनेट आझादीचा नवीन प्रकार आणू पाहात आहेत. त्याला ‘नेट न्यूट्रेलिटी’ हे गोंडस नाव दिले गेले आहे. त्यात काही सेवा या पूर्णत: मोफत असतील तर काहींसाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. त्याचप्रमाणे काही सेवेची स्पीड कमी असेल तर काहींची जास्त राहील. विशेष असे, या सर्व सेवेचे संपूर्ण अधिकार टेलिकॉम कंपन्यांकडे राहणार आहे. कदाचित फेसबूक, गुगलसाठी प्रत्येकी ३० रुपये, वॉटस्अ‍ॅपसाठी ७५ रुपये, फ्लिपकार्ट-अमॅझोनसाठी प्रत्येकी ५० रुपये तर न्यूज अ‍ॅपसाठी १० रुपये बेसिक चार्ज द्यावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांचे इंटरनेट स्वातंत्र्य हिसकावले जाणार आहे. ग्राहकांनी यातील संभाव्य धोके लक्षात घेता आतापासूनच ‘नेट न्यूट्रेलिटी’ला तीव्र विरोध चालविला आहे. त्यातूनच आतापर्यंत ‘ट्राय’च्या माध्यमातून ‘नेट न्यूट्रेलिटी’ला विरोध दर्शविणारे दहा लाख आक्षेप सरकार दरबारी दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.या क्षेत्रातील अनेक एक्सपर्टनेही ‘नेट न्यूट्रेलिटी’ ग्राहकांच्या आर्थिक हिताच्यादृष्टीने परवडणारी नसल्याचे म्हटले आहे. मोबाईल कंपन्यांच्या दाव्यानुसार, कॉलिंग आणि एसएमएसच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी इंटरनेटचा डाटा वापर वाढल्याची आणि पर्यायाने टेलिकॉम कंपन्यांचा फायदा झाल्याची बाबही दुर्लक्षित करता येणार नसल्याचे एक्सपर्टने सांगितले. ‘नेट न्यूट्रेलिटी’च्या मुद्यावर सरकार गप्प आहे. ‘ट्राय’ने यावर ग्राहकांकडून आक्षेप मागविले आहेत. इंटरनेट-ओआरजी किंवा एअरटेल-झिरो यासारख्या योजना ग्राहकांना खूप आकर्षक वाटत असल्या तरी यात ग्राहकाचे स्वत:चे इंटरनेट स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती यवतमाळातील इंटरनेट एक्सपर्टने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ‘नेट न्यूट्रेलिटी’ला आपला विरोध असल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रवीशंकर सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी अथवा सरकारने आपली ठोस भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांना ‘ट्राय’च्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच केंद्र सरकार ‘नेट न्यूट्रेलिटी’बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)