शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नेरची ग्रामीण आरोग्य यंत्रणा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:00 IST

ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्राला कुलूप : एका परिचारिकेकडे तीन गावे

आॅनलाईन लोकमतनेर : ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे. या केंद्रांमध्ये कार्यरत परिचारिकांकडे इतर गावांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गरजू आणि गरीब रुग्णांना नाईलाजाने शहरात जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे. तालुका आणि जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.तालुक्यात असलेल्या बहुतांश आरोग्य केंद्राचा कारभार आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सुविधांचा अभाव, अधिकाºयांचे सोयीच्या ठिकाणावरून काम या व इतर कारणांमुळे हे केंद्र नामधारी ठरले आहे. त्यात भरीस भर म्हणजे आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणाºया परिचारिकांवरही अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर ठिकाणची जबाबदारी सांभाळत असताना आरोग्य केंद्र कुलूपबंद ठेवले जातात.मोझर प्राथमिक आरोग्य केंद्रही याला अपवाद ठरले नाही. या केंद्राच्या परिचारिकेवर मोझर, रत्नापूर, लोहतवाडी या तीन गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकट्या मोझरची लोकसंख्या पाच हजार इतकी आहे. लोहतवाडी आणि रत्नापूर या गावची लोकसंख्या प्रत्येकी एक हजार आहे. परिचारिकांना या गावात जाऊन सेवा द्यावी लागते. बाहेरगावी परिचारिका गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळणार कोण, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न अधिकाºयांनी मात्र कधीही लक्षात घेतला नाही. बाहेरगावी असलेल्या परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्रही वेळेवर उघडू शकत नाही. अशावेळी उपचारासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.विविध योजना राहतात कागदावरचआरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र त्या कागदावरच असल्याचे दिसून येते. गरिबांना योजनांचा लाभ अपवादानेच मिळतो. योजना राबविण्यासाठी आवश्यक तेवढी यंत्रणाच तालुक्यात नाही. अशावेळी यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.