शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नेरची ग्रामीण आरोग्य यंत्रणा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:00 IST

ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्राला कुलूप : एका परिचारिकेकडे तीन गावे

आॅनलाईन लोकमतनेर : ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे. या केंद्रांमध्ये कार्यरत परिचारिकांकडे इतर गावांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गरजू आणि गरीब रुग्णांना नाईलाजाने शहरात जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे. तालुका आणि जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.तालुक्यात असलेल्या बहुतांश आरोग्य केंद्राचा कारभार आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सुविधांचा अभाव, अधिकाºयांचे सोयीच्या ठिकाणावरून काम या व इतर कारणांमुळे हे केंद्र नामधारी ठरले आहे. त्यात भरीस भर म्हणजे आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणाºया परिचारिकांवरही अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर ठिकाणची जबाबदारी सांभाळत असताना आरोग्य केंद्र कुलूपबंद ठेवले जातात.मोझर प्राथमिक आरोग्य केंद्रही याला अपवाद ठरले नाही. या केंद्राच्या परिचारिकेवर मोझर, रत्नापूर, लोहतवाडी या तीन गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकट्या मोझरची लोकसंख्या पाच हजार इतकी आहे. लोहतवाडी आणि रत्नापूर या गावची लोकसंख्या प्रत्येकी एक हजार आहे. परिचारिकांना या गावात जाऊन सेवा द्यावी लागते. बाहेरगावी परिचारिका गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळणार कोण, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न अधिकाºयांनी मात्र कधीही लक्षात घेतला नाही. बाहेरगावी असलेल्या परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्रही वेळेवर उघडू शकत नाही. अशावेळी उपचारासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.विविध योजना राहतात कागदावरचआरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र त्या कागदावरच असल्याचे दिसून येते. गरिबांना योजनांचा लाभ अपवादानेच मिळतो. योजना राबविण्यासाठी आवश्यक तेवढी यंत्रणाच तालुक्यात नाही. अशावेळी यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.