शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

नेर परिसरातील समस्या दुर्लक्षित

By admin | Updated: January 16, 2017 01:12 IST

शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे.

रस्त्याची दुर्दशा : वीज आणि सांडपाण्याचा प्रश्न गंभीर नेर : शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. रस्ते, वीज, सांडपाण्याच्या नाल्या या समस्यांना तोंड देता देता नागरिकांना नाकीनऊ येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न निकाली काढला जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गिट्टी उखडली आहे. यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अशात नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी अनियमित आणि कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. या प्रकारात दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहे. शिवाय शेती पिकाला पाणी देण्याचाही प्रश्न आहे. उद्योग-व्यवसायावरही परिणाम होत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठाही प्रभावित होत असल्याचे सांगितले जाते. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने जागोजागी गटारं तयार झाले आहेत. ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्या नियमित उपसल्या जात नाही. त्यात अडलेल्या पाण्याची दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारीही हा प्रश्न सोडविण्यात चालढकल करत आहे. या सर्व समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी) पदाधिकारी गुंतले निवडणूक कामात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे परिसराशी संबंधित प्रतिनिधी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. एखाद्याकडे समस्या मांडल्यास आचारसंहिता लागल्याचे कारण पुढे केले जाते. वास्तविक पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी साधारण स्वरूपाच्या समस्याही निकाली काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले नाही. त्यामुळे आता नागरिकांना साध्या-साध्या समस्या सोडवून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामसेवकही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे या समस्या आणखी किती दिवस रखडून राहणार हा प्रश्न आहे. तालुका प्रशासनाकडून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने कुठल्याही हालचाली होत नाही. आता नागरिकांना नवीन सदस्यांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.