शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नेर परिसरातील समस्या दुर्लक्षित

By admin | Updated: January 16, 2017 01:12 IST

शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे.

रस्त्याची दुर्दशा : वीज आणि सांडपाण्याचा प्रश्न गंभीर नेर : शहरासह तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. रस्ते, वीज, सांडपाण्याच्या नाल्या या समस्यांना तोंड देता देता नागरिकांना नाकीनऊ येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न निकाली काढला जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गिट्टी उखडली आहे. यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अशात नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी अनियमित आणि कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. या प्रकारात दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहे. शिवाय शेती पिकाला पाणी देण्याचाही प्रश्न आहे. उद्योग-व्यवसायावरही परिणाम होत आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठाही प्रभावित होत असल्याचे सांगितले जाते. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने जागोजागी गटारं तयार झाले आहेत. ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्या नियमित उपसल्या जात नाही. त्यात अडलेल्या पाण्याची दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारीही हा प्रश्न सोडविण्यात चालढकल करत आहे. या सर्व समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी) पदाधिकारी गुंतले निवडणूक कामात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे परिसराशी संबंधित प्रतिनिधी निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. एखाद्याकडे समस्या मांडल्यास आचारसंहिता लागल्याचे कारण पुढे केले जाते. वास्तविक पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी साधारण स्वरूपाच्या समस्याही निकाली काढण्यासाठी चांगले प्रयत्न केले नाही. त्यामुळे आता नागरिकांना साध्या-साध्या समस्या सोडवून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामसेवकही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे या समस्या आणखी किती दिवस रखडून राहणार हा प्रश्न आहे. तालुका प्रशासनाकडून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने कुठल्याही हालचाली होत नाही. आता नागरिकांना नवीन सदस्यांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.