शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

झिरो पेंडन्सीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 25, 2015 03:14 IST

राज्य शासनाने २०११ मध्येच झिरो पेंडन्सीचा आदेश दिला आहे. मात्र यवतमाळ जिल्हा परिषदेकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शिक्षक संतप्त : गांधी जयंतीपासून करणार सत्याग्रह आंदोलनयवतमाळ : राज्य शासनाने २०११ मध्येच झिरो पेंडन्सीचा आदेश दिला आहे. मात्र यवतमाळ जिल्हा परिषदेकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेकडो समस्या अद्यापही प्रलंबित असून त्याविरुद्ध शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागण्यांना दाद मिळत नसल्याने अखेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात गांधी जयंतीपासून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक समितीने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चे, आंदोलने आणि निवेदने या माध्यमातून या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र त्याकडे वेळोवेळी दुर्लक्षच करण्यात येत आहे. राज्य शासनाने झिरो पेंडन्सीचा निर्णय १५ सप्टेंबर २०११ रोजी घेतला होता. या आदेशाला आता चार वर्षे झाली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत यवतमाळ जिल्हा परिषद गंभीर दिसत नाही. एकट्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नोंदविलेल्या तब्बल २६ समस्या गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. झिरो पेंडन्सीनुसार यातील अनेक समस्या तातडीने निकाली निघण्यासारख्या आहेत. मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी अखेर २ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन व त्यासोबतच ३ आॅक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, देवेंद्र चांदेकर, किशोर सरोदे, हरिदास कैकाडे, प्रकाश भरमकार, घाटंजी तालुकाध्यक्ष रवींद्र उमाटे आदींनी आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आदींना निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)