शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

झिरो पेंडन्सीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 25, 2015 03:14 IST

राज्य शासनाने २०११ मध्येच झिरो पेंडन्सीचा आदेश दिला आहे. मात्र यवतमाळ जिल्हा परिषदेकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

शिक्षक संतप्त : गांधी जयंतीपासून करणार सत्याग्रह आंदोलनयवतमाळ : राज्य शासनाने २०११ मध्येच झिरो पेंडन्सीचा आदेश दिला आहे. मात्र यवतमाळ जिल्हा परिषदेकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेकडो समस्या अद्यापही प्रलंबित असून त्याविरुद्ध शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागण्यांना दाद मिळत नसल्याने अखेर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात गांधी जयंतीपासून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक समितीने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चे, आंदोलने आणि निवेदने या माध्यमातून या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र त्याकडे वेळोवेळी दुर्लक्षच करण्यात येत आहे. राज्य शासनाने झिरो पेंडन्सीचा निर्णय १५ सप्टेंबर २०११ रोजी घेतला होता. या आदेशाला आता चार वर्षे झाली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत यवतमाळ जिल्हा परिषद गंभीर दिसत नाही. एकट्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नोंदविलेल्या तब्बल २६ समस्या गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. झिरो पेंडन्सीनुसार यातील अनेक समस्या तातडीने निकाली निघण्यासारख्या आहेत. मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी अखेर २ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन व त्यासोबतच ३ आॅक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, देवेंद्र चांदेकर, किशोर सरोदे, हरिदास कैकाडे, प्रकाश भरमकार, घाटंजी तालुकाध्यक्ष रवींद्र उमाटे आदींनी आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आदींना निवेदन दिले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)