शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी

By admin | Updated: December 6, 2015 02:30 IST

एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये.

सतीश पेंदाम : महात्मा जोतिबा फुले-बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्व यवतमाळ : एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये. विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी असते, असे प्रतिपादन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता सतीश पेंदाम यांनी येथे केले. येथील आझाद मैदानावर आयोजित महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वात ते ‘क्रांतिवीर शामादादा कोलाम : आदिम स्वातंत्र समर’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यीक बाबाराव मडावी होते. पेंदाम म्हणाले, सुखवस्तू समाजाच्या विकासावर आज भर दिला जातो. जीवंत राहण्याची काळजी घेण्यापेक्षा मृत्यूनंतर काही लाख देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पुरस्कार देऊन आवाज बंद होणार असतील तर असे पुरस्कार नाकारले पाहिजे, असे ते म्हणाले. खरे क्रांतिकारी गुन्हेगार ठरले आणि गुन्हेगारांना क्रांतिकारक म्हणून गौरविले हा येथील इतिहास आहे. आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल यासाठी १२२ वर्ष संघर्ष केला. शामादादाने ४० वर्ष लढा दिला. आज आदिवासी आणि बहुजन समाजाला विकासाबरोबरच न्यायहक्कासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विचारपीठावर रामचंद्र जंगले, पांडुरंग मसराम, बाळकृष्ण गेडाम, बी.डी. आडे, पांडुरंग व्यवहारे, नामदेव पेंदोरे, सुरेश सिडाम, प्रा.डॉ. अशोक कांबळे, किशोर उईके, किरण कुमरे, ताणीबाई आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. काशिनाथ लाहोरे, माधुरी अंजीकर, प्रा.डॉ. अशोक कांबळे यांनी शामादादा कोलाम यांच्या जीवनावर वसंत कनाके लिखित पुस्तकावर समिक्षा केली. प्रास्ताविक बिरसा ब्रिगेड यवतमाळचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, संचालन रामचंद्र आत्राम आणि प्रेरणा कन्नाके यांनी तर आभार वसंत कन्नाके यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)