शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी

By admin | Updated: December 6, 2015 02:30 IST

एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये.

सतीश पेंदाम : महात्मा जोतिबा फुले-बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्व यवतमाळ : एकवेळ आर्थिक गरिबी परवडली, परंतु समाजात विचारांची गरिबी असता कामा नये. विचारांची गरिबी गुलामगिरीला प्रोत्साहन देणारी असते, असे प्रतिपादन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता सतीश पेंदाम यांनी येथे केले. येथील आझाद मैदानावर आयोजित महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीपर्वात ते ‘क्रांतिवीर शामादादा कोलाम : आदिम स्वातंत्र समर’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यीक बाबाराव मडावी होते. पेंदाम म्हणाले, सुखवस्तू समाजाच्या विकासावर आज भर दिला जातो. जीवंत राहण्याची काळजी घेण्यापेक्षा मृत्यूनंतर काही लाख देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पुरस्कार देऊन आवाज बंद होणार असतील तर असे पुरस्कार नाकारले पाहिजे, असे ते म्हणाले. खरे क्रांतिकारी गुन्हेगार ठरले आणि गुन्हेगारांना क्रांतिकारक म्हणून गौरविले हा येथील इतिहास आहे. आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल यासाठी १२२ वर्ष संघर्ष केला. शामादादाने ४० वर्ष लढा दिला. आज आदिवासी आणि बहुजन समाजाला विकासाबरोबरच न्यायहक्कासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विचारपीठावर रामचंद्र जंगले, पांडुरंग मसराम, बाळकृष्ण गेडाम, बी.डी. आडे, पांडुरंग व्यवहारे, नामदेव पेंदोरे, सुरेश सिडाम, प्रा.डॉ. अशोक कांबळे, किशोर उईके, किरण कुमरे, ताणीबाई आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. काशिनाथ लाहोरे, माधुरी अंजीकर, प्रा.डॉ. अशोक कांबळे यांनी शामादादा कोलाम यांच्या जीवनावर वसंत कनाके लिखित पुस्तकावर समिक्षा केली. प्रास्ताविक बिरसा ब्रिगेड यवतमाळचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, संचालन रामचंद्र आत्राम आणि प्रेरणा कन्नाके यांनी तर आभार वसंत कन्नाके यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)