शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन करण्याची गरज

By admin | Updated: May 12, 2016 02:44 IST

मानवाला प्राणवायू देणारी, पाऊस पाडणारी, अन्न देणारी यंत्रणा केवळ झाडे आणि जंगले आहे.

मधुकर घारड : जलबचत अभियान कार्यशाळापुसद : मानवाला प्राणवायू देणारी, पाऊस पाडणारी, अन्न देणारी यंत्रणा केवळ झाडे आणि जंगले आहे. जीवन सुव्यवस्थित करावयाचे असेल तर जमिनीच्या ३३ टक्के भूभागावर झाडे लावणे गरजेचे आहे. आजमितीस निसर्गसाक्षरता हरविल्याने समस्या निर्माण झाली असून पाणीटंचाईवर मात करून दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन आणि जलपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अमरावती विभागीय वनराई अध्यक्ष डॉ.मधुकर घारड यांनी येथे केले.जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील बाबासाहेब अभियांत्रिकी महाविद्यालयात जलबचत अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुसद अर्बन बँकेच्या पुढाकाराने शहरातील सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, राज नाईक, सचिन कोकाटे, प्रा.राजेश पाचपोर, श्रीरामपूरचे सरपंच नाना बेले, काकडदातीचे सरपंच भारत वानखडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन कोकाटे यांनी जलबचत करण्यासोबतच नदी पुनर्भरण प्रकल्पाबाबत माहिती दिली. प्रा.राजेश पाचपोर यांनी जलपुनर्भरणाच्या विविध पद्धतीचे पॉवर प्रेझेंटेशनद्वारा मार्गदर्शन केले. डॉ.एन.पी. हिराणी, शरद मैंद यांनी मार्गदर्शन केले. संचालन मनीष अनंतवार यांनी केले. या प्रसंगी १० मे ते ३० जूनपर्यंत शहरातील विविध भागात जलबचत अभियान राबवून तब्बल दोन हजार ठिकाणी जलपुनर्भरण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला लक्ष्मणराव जाधव, दीपक आसेगावकर, जयवंतराव पाटील, राधेश्याम जांगीड, दिगंबर जगताप, अजय पुरोहित, मिलिंद उदेपूरकर, डॉ.जय भोपी, वसंतराव पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेश खडसे, सुरेश दुबेवार, निशांत बयास, विजय जाधव, धनंजय सोनी, ललित सेता, विनायक डुबेवार, के.आय. मिर्झा, विनायक सेवकर, प्राचार्य हमेश नानवाला, दीपक जाधव यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)