शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

सोयाबीनला पर्याय उभा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; चार जिल्ह्यांमध्ये केला अभ्यास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांनी बहुतेक क्षेत्र व्यापल्याने पिकांचा फेरपालट होण्यासाठी फारसे पर्याय राहिलेल नाही. मागील पाच वर्षातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता सोयाबीनला पर्यायी पीक उभे करण्याची गरज दिसून येत आहे. हा निष्कर्ष यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातून काढण्यात आला आहे. अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याच्या २२ तालुक्यातील ९४ गावात ४४२ शेतकऱ्यांच्या भेटी घेवून या विद्यार्थ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. तसा अहवाल तयार करण्यात आला. ५० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली. अशा बियाण्यांबाबत कंपन्यांसह शासकीय यंत्रणेवर कठोर कारवाई व्हावी, शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांचे संरक्षण करावे, असा निष्कर्ष सोयाबीनबाबत मांडण्यात आला आहे.देशातील शेतमालाचे दर इतर जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत खूप कमी आहे. किमान उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबालासुद्धा ते परवडणारे आहे. या दरामध्ये कुठल्याही कारणाने थोडी वाढ झाली की आकांत करणे आपण थांबविले पाहिजे, असे अहवालात नमूद केले आहे. नुकसान झाल्यानंतर पिकांचा विमा मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. विमा कंपन्यांनी तात्काळ भरपाई द्यावी, अशा सूचना शासनाने या कंपन्यांना कराव्या, अशी शेतकरी वर्गाची     विनंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे या संशोधक गटाने शेती आणि शेतकरी याबाबत सर्वेक्षणात अनेक निष्कर्ष काढले आहेत.या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते समाजकार्य महाविद्यालयात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. रमाकांत कोलते हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डाॅ. अविनाश शिर्के यांनी केले. प्रा. घनश्याम दरणे यांनी अनुभव सांगितले. संचालनाची जबाबदारी प्रा.डाॅ. सीमा शेटे यांनी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती