शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

सोयाबीनला पर्याय उभा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; चार जिल्ह्यांमध्ये केला अभ्यास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांनी बहुतेक क्षेत्र व्यापल्याने पिकांचा फेरपालट होण्यासाठी फारसे पर्याय राहिलेल नाही. मागील पाच वर्षातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता सोयाबीनला पर्यायी पीक उभे करण्याची गरज दिसून येत आहे. हा निष्कर्ष यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातून काढण्यात आला आहे. अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याच्या २२ तालुक्यातील ९४ गावात ४४२ शेतकऱ्यांच्या भेटी घेवून या विद्यार्थ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. तसा अहवाल तयार करण्यात आला. ५० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली. अशा बियाण्यांबाबत कंपन्यांसह शासकीय यंत्रणेवर कठोर कारवाई व्हावी, शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांचे संरक्षण करावे, असा निष्कर्ष सोयाबीनबाबत मांडण्यात आला आहे.देशातील शेतमालाचे दर इतर जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत खूप कमी आहे. किमान उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबालासुद्धा ते परवडणारे आहे. या दरामध्ये कुठल्याही कारणाने थोडी वाढ झाली की आकांत करणे आपण थांबविले पाहिजे, असे अहवालात नमूद केले आहे. नुकसान झाल्यानंतर पिकांचा विमा मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. विमा कंपन्यांनी तात्काळ भरपाई द्यावी, अशा सूचना शासनाने या कंपन्यांना कराव्या, अशी शेतकरी वर्गाची     विनंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे या संशोधक गटाने शेती आणि शेतकरी याबाबत सर्वेक्षणात अनेक निष्कर्ष काढले आहेत.या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते समाजकार्य महाविद्यालयात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. रमाकांत कोलते हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डाॅ. अविनाश शिर्के यांनी केले. प्रा. घनश्याम दरणे यांनी अनुभव सांगितले. संचालनाची जबाबदारी प्रा.डाॅ. सीमा शेटे यांनी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती