शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मातृत्वाचा परिघ वाढविण्याची गरज

By admin | Updated: December 15, 2014 23:09 IST

समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना

मंगलाताई शाह : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ उपक्रमयवतमाळ : समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना समाज वाळीत टाकतो. त्यांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी हवी आहे. त्यांची ऊर्जा टिकविण्यासाठी गरज आहे ती मायेची, थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. यासाठी समाजाने आपल्या कुटुंबापुरता विचार न करता मातृत्त्वाचा परिघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या संस्थापक संचालिका आणि ‘पालवी’ या विशेष बालकांच्या संगोपन प्रकल्पाच्या समन्वयक मंगलाताई शाह यांनी केले.स्वप्नवेड्या माणसांशी प्रेरणादायी संवादाचा मासिक कार्यक्रम अंतर्गत प्रयास-सेवांकूर अमरावतीद्वारा डॉ. अविनाश सावजी प्रेरित ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या उपक्रमाचे नववे पुष्प मंगलाताई शहा यांनी रविवारी येथील नंदूरकर विद्यालयाच्या क्रीडारंजन सभागृहात गुंफले. अनाथ मुलांबरोबरच अनाथ महिलांसाठीही काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजकार्यासाठी मदत मागण्याची लाज वाटता कामा नये यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी पदराची झोळी धरली होती. त्यात उपस्थितांनी यशाशक्ती मदत टाकली. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचरा कुंडी, स्मशानभूमीत टाकून दिलेल्या अनाथ एचआयव्ही बालकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावे म्हणून ‘पालवी’ धडपडत आहे. पालवीत मुलांना पोषक आहार, प्राथमिक शिक्षण आणि आवश्यक आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. साधारणत: १३ वर्षांपूर्वी मंगलाताई शहा यांनी पंढरपूर येथे बालकांच्या संगोपनासाठी पालवीची स्थापना केली. कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता आज या प्रकल्पात ७२ बालके आनंदाने वाढत आहेत. सर्वांना आधार देणे शक्य नसले तरी कमीतकमी ५०० बालकांचा निवासी प्रकल्प सुरू करण्याच्यादृष्टीने ‘पालवी’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी समाजाने आपापल्यापरीने मदत करावी, असे आवाहन मंगलातार्इंनी यावेळी केले. संचालन आणि आभार निखिल परोपटे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)