शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

मातृत्वाचा परिघ वाढविण्याची गरज

By admin | Updated: December 15, 2014 23:09 IST

समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना

मंगलाताई शाह : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ उपक्रमयवतमाळ : समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना समाज वाळीत टाकतो. त्यांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी हवी आहे. त्यांची ऊर्जा टिकविण्यासाठी गरज आहे ती मायेची, थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. यासाठी समाजाने आपल्या कुटुंबापुरता विचार न करता मातृत्त्वाचा परिघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या संस्थापक संचालिका आणि ‘पालवी’ या विशेष बालकांच्या संगोपन प्रकल्पाच्या समन्वयक मंगलाताई शाह यांनी केले.स्वप्नवेड्या माणसांशी प्रेरणादायी संवादाचा मासिक कार्यक्रम अंतर्गत प्रयास-सेवांकूर अमरावतीद्वारा डॉ. अविनाश सावजी प्रेरित ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या उपक्रमाचे नववे पुष्प मंगलाताई शहा यांनी रविवारी येथील नंदूरकर विद्यालयाच्या क्रीडारंजन सभागृहात गुंफले. अनाथ मुलांबरोबरच अनाथ महिलांसाठीही काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजकार्यासाठी मदत मागण्याची लाज वाटता कामा नये यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी पदराची झोळी धरली होती. त्यात उपस्थितांनी यशाशक्ती मदत टाकली. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचरा कुंडी, स्मशानभूमीत टाकून दिलेल्या अनाथ एचआयव्ही बालकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावे म्हणून ‘पालवी’ धडपडत आहे. पालवीत मुलांना पोषक आहार, प्राथमिक शिक्षण आणि आवश्यक आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. साधारणत: १३ वर्षांपूर्वी मंगलाताई शहा यांनी पंढरपूर येथे बालकांच्या संगोपनासाठी पालवीची स्थापना केली. कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता आज या प्रकल्पात ७२ बालके आनंदाने वाढत आहेत. सर्वांना आधार देणे शक्य नसले तरी कमीतकमी ५०० बालकांचा निवासी प्रकल्प सुरू करण्याच्यादृष्टीने ‘पालवी’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी समाजाने आपापल्यापरीने मदत करावी, असे आवाहन मंगलातार्इंनी यावेळी केले. संचालन आणि आभार निखिल परोपटे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)