शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाचा परिघ वाढविण्याची गरज

By admin | Updated: December 15, 2014 23:09 IST

समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना

मंगलाताई शाह : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ उपक्रमयवतमाळ : समाजात आजही एचआयव्ही/एड्स विषयी पुरेशी जागृती नाही. गैरसमज खूप आहे. या व्याधीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांना अक्षरश: कोठेही टाकून दिले जाते. या अनाथ बालकांना समाज वाळीत टाकतो. त्यांना केवळ सहानुभूतीची गरज नाही, तर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी हवी आहे. त्यांची ऊर्जा टिकविण्यासाठी गरज आहे ती मायेची, थोडासा आधार आणि प्रोत्साहनाची. यासाठी समाजाने आपल्या कुटुंबापुरता विचार न करता मातृत्त्वाचा परिघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या संस्थापक संचालिका आणि ‘पालवी’ या विशेष बालकांच्या संगोपन प्रकल्पाच्या समन्वयक मंगलाताई शाह यांनी केले.स्वप्नवेड्या माणसांशी प्रेरणादायी संवादाचा मासिक कार्यक्रम अंतर्गत प्रयास-सेवांकूर अमरावतीद्वारा डॉ. अविनाश सावजी प्रेरित ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’ या उपक्रमाचे नववे पुष्प मंगलाताई शहा यांनी रविवारी येथील नंदूरकर विद्यालयाच्या क्रीडारंजन सभागृहात गुंफले. अनाथ मुलांबरोबरच अनाथ महिलांसाठीही काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजकार्यासाठी मदत मागण्याची लाज वाटता कामा नये यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी पदराची झोळी धरली होती. त्यात उपस्थितांनी यशाशक्ती मदत टाकली. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, कचरा कुंडी, स्मशानभूमीत टाकून दिलेल्या अनाथ एचआयव्ही बालकांना त्यांचे मुलभूत हक्क मिळावे म्हणून ‘पालवी’ धडपडत आहे. पालवीत मुलांना पोषक आहार, प्राथमिक शिक्षण आणि आवश्यक आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. साधारणत: १३ वर्षांपूर्वी मंगलाताई शहा यांनी पंढरपूर येथे बालकांच्या संगोपनासाठी पालवीची स्थापना केली. कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता आज या प्रकल्पात ७२ बालके आनंदाने वाढत आहेत. सर्वांना आधार देणे शक्य नसले तरी कमीतकमी ५०० बालकांचा निवासी प्रकल्प सुरू करण्याच्यादृष्टीने ‘पालवी’ प्रयत्नशील आहे. त्यासाठी समाजाने आपापल्यापरीने मदत करावी, असे आवाहन मंगलातार्इंनी यावेळी केले. संचालन आणि आभार निखिल परोपटे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)