पुसद : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित झाली नाही. त्यामुळे धम्म प्रवाहात सामील होवून जाती निर्मूलनाद्वारेच सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित करता येईल. जन्माने कोणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसून कर्मानेच श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा.डॉ. सीमा मेश्राम यांनी केले. येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘जाती निर्मूलनासाठी आंबेडकरी स्त्रियांसमोरील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका नीता खडसे होत्या. यावेळी आशाताई कदम, प्रा.डॉ.वंदना फुंडकर, सीमा तायडे, डॉ.मनोरमा वाढवे, प्रा.अनिता कांबळे, प्रा.रंजना मेंढे, प्रा.खिराडे, मीनाक्षी मोटघरे, सीमा गिऱ्हे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.जनार्दन गजभिये आणि संचाने भीमगीते सादर केली. तर संबोधी महिला मंडळाने सामूहिक बुद्धवंदना सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेश वाढवे, महेश खडसे, शीतल वानखेडे, मिलिंद हट्टेकर, विठ्ठल खडसे, गणेश वाढोरे, प्रभाकर गवारगुरू, यादव जांभूळकर, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, मुन्ना हाटे, प्रशांत धुळे, शशांक भरणे, प्रफुल्ल भालेराव, बी.एस. कांबळे, दादाराव अगमे, संजय वाढवे, सुरेश कांबळे, प्रा.विलास भवरे, बंडू राऊत, किशोर कांबळे, शरद ठेंबरे, पाटील आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
आर्थिक समतेसाठी जाती निर्मूलन आवश्यक
By admin | Updated: April 19, 2016 06:09 IST