शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:38 IST

दारव्हा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी युद्धपातळीवर सामूहिक प्रयत्न करण्याची गरज ...

दारव्हा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी युद्धपातळीवर सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोरोना आजारासंबंधी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी बोलताना आमदार राठोड यांनी या संकटावर मात करण्याकरिता प्रशासनासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड, बीडीओ राजीव शिंदे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, टीएचओ डॉ.मुकेश खांदवे उपस्थित होते.

येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा, ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि इतर आवश्यक औषध पुरवठा सुरळीत राहील, यावर लक्ष केंद्रित करून संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, लसीकरण याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना आमदार राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

सुरुवातीला ॲक्टिव्ह रुग्णसंख्या, चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबिंबित क्षेत्र, लसीकरण, कोविड सेंटरवरील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुशांत इंगोले, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

बाॅक्स

ऑक्सिजन प्लांट दोन दिवसांत सुरू करा

आमदार संजय राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू होत असलेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन माहिती घेतली. सध्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. ही भटकंती थांबविण्यासाठी पुढील दोन दिवसांत हा प्लांट सुरू करा, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विक्रमसिंह कदम उपस्थित होते.

बॉक्स

रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रयत्न

मतदार संघातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आमदार संजय राठोड यांनी घेतला. रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच रुग्णसंख्या आणखी वाढू नये, यासाठी आपला नियमित पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.