शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

भेसळयुक्त पदार्थापासून सावध राहण्याची गरज

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ : सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी कोणतेही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न व औषधी प्रशासन विभागाने केले आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषत: दुधजन्य पदार्थांना या काळात मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा भेसळयुक्त खवा पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळ जिल्हयात मात्र अद्याप यावर्षी असा प्रकार उघडकीस आला नाही. परंतु तरीदेखील ग्राहकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.खव्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांना ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात खवा उपलब्ध होत नसल्याने भेसळयुक्त खव्याची विक्री अशा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक विक्रेत्यांशिवाय बाहेरगावहून आणि इतर प्रांतातूनही असा खवा विक्रीस येतो. अशा खव्यापासून बनविण्यात आलेले पदार्थ निश्चितच आरोग्यास हानीकारक असतात. दुकानांमध्ये आकर्षक पॅकींगमध्ये वेगवेगळ्या मिक्स मिठाई सजविलेल्या असतात. असे पदार्थ पाहून कुणालाही ते घेतल्यावाचून राहवत नाही. परंतु असे पदार्थ घेताना खात्रीपूर्वक दुकानातूनच ते खरेदी करणे आवश्यक आहे. शिवाय आपण खरेदी करीत असलेल्या पदार्थांचे पक्के बील घेणे गरजेचे आहे. कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून घ्यावी. कालबाह्य तारखेतील पदार्थ घेऊ नये. मिळायांसोबतच किराणा दुकानातील साहित्य खरेदी करतानासुद्धा काळजी बाळगणे गरजेचे आहे. काही दुकानांमध्ये वर्षभरात न खपलेला कालबाह्य माल दिवाळीतील गर्दी पाहून विक्रीस काढण्यात येतो. तेंव्हा ग्राहकांनी खात्रीच्याच दुकानातून आणि नीट पाहणी केल्यानंतरच अशा मालाची खरेदी करणे आवश्यक आहे. आपली कोणतीही फसवणूक होणार नाही, याबाबत ग्राहकांनी स्वत: तत्पर असणे केंव्हाही चांगले. त्यानंतरसुद्धा ग्रहकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी त्वरित अन्न औषधी प्रशासनच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधून लेखी तक्रार करावी, तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेला कळवावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नितीन कापसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)