शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

भेसळयुक्त पदार्थापासून सावध राहण्याची गरज

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ : सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी कोणतेही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न व औषधी प्रशासन विभागाने केले आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषत: दुधजन्य पदार्थांना या काळात मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा भेसळयुक्त खवा पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळ जिल्हयात मात्र अद्याप यावर्षी असा प्रकार उघडकीस आला नाही. परंतु तरीदेखील ग्राहकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.खव्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांना ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात खवा उपलब्ध होत नसल्याने भेसळयुक्त खव्याची विक्री अशा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक विक्रेत्यांशिवाय बाहेरगावहून आणि इतर प्रांतातूनही असा खवा विक्रीस येतो. अशा खव्यापासून बनविण्यात आलेले पदार्थ निश्चितच आरोग्यास हानीकारक असतात. दुकानांमध्ये आकर्षक पॅकींगमध्ये वेगवेगळ्या मिक्स मिठाई सजविलेल्या असतात. असे पदार्थ पाहून कुणालाही ते घेतल्यावाचून राहवत नाही. परंतु असे पदार्थ घेताना खात्रीपूर्वक दुकानातूनच ते खरेदी करणे आवश्यक आहे. शिवाय आपण खरेदी करीत असलेल्या पदार्थांचे पक्के बील घेणे गरजेचे आहे. कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून घ्यावी. कालबाह्य तारखेतील पदार्थ घेऊ नये. मिळायांसोबतच किराणा दुकानातील साहित्य खरेदी करतानासुद्धा काळजी बाळगणे गरजेचे आहे. काही दुकानांमध्ये वर्षभरात न खपलेला कालबाह्य माल दिवाळीतील गर्दी पाहून विक्रीस काढण्यात येतो. तेंव्हा ग्राहकांनी खात्रीच्याच दुकानातून आणि नीट पाहणी केल्यानंतरच अशा मालाची खरेदी करणे आवश्यक आहे. आपली कोणतीही फसवणूक होणार नाही, याबाबत ग्राहकांनी स्वत: तत्पर असणे केंव्हाही चांगले. त्यानंतरसुद्धा ग्रहकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी त्वरित अन्न औषधी प्रशासनच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधून लेखी तक्रार करावी, तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेला कळवावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नितीन कापसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)