शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान

By admin | Updated: September 6, 2014 02:22 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे.

यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी एकदा तरी यवतमाळ अथवा दिग्रस मधून विधानसभा लढवावी, यवतमाळात काँग्रेससोबतच्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रवादी केव्हाही तयार आहे, असे आव्हान येथे आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी दिले आहे. दिग्रस मतदार संघात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे काहीच वजन नाही. म्हणूनच त्यांनी आपला परपंरागत मतदार संघ सोडून दिला आहे. येथे काँग्रेसचे दोन माजी मंत्री असूनही कोणीच शिवसेने विरोधात लढण्यास तयार नाही. प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावची ग्रामपंचायतही वाचविता आली नाही. त्यामुळे येथे डाळ शिजणार नाही हे त्याच्या लक्षात आले आहे. माणिकराव ठाकरे यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. यवतमाळ नगराध्यक्ष निवडीतही त्यांनी राष्ट्रवादीला मदत करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसचा उमेदवार उतरविण्यासाठी धडपड केली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत राहूनही विरोधकाप्रमाणे संघर्ष करावा लागला. काँग्रेसच्या मंत्र्यानी नेहमीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना त्याची जागा दाखविण्याचे काम जिल्ह्यात राष्ट्रवादी करणार आहे. राज्य पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात याची स्थिती वेगळी राहणार आहे. जिल्ह्यातील घाटाच्यावर म्हणजेच यवतमाळात राष्ट्रवादीची भूमिका पूर्णत: वेगळी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला जागा दाखविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)