शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काढणार हल्लाबोल दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 09:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेस येत्या नागपूर अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ काढणार आहे. त्यात राज्यभरातील त्रस्त शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशरद पवार यांचा निर्धार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागविणार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळालेला नसताना राज्य शासन कर्जमाफी केल्याची ‘मी लाभार्थी’ जाहिरात करीत आहे. ही फसवाफसवी आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस येत्या नागपूर अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ काढणार आहे. त्यात राज्यभरातील त्रस्त शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.बोंडअळीच्या आक्रमणाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यवतमाळात आले होते. त्यांनी नेर आणि कळंब तालुक्यातील शेतात जाऊन कापसाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विदर्भाचा दौरा करताना या सरकारवर लोकांची नाराजी स्पष्ट दिसली. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री वारंवार तारखा वाढवित आहेत. आतापर्यंत सहा परिपत्रके काढली. तरी अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. सरकार महिलेच्या नावावरील कर्जाला प्राधान्य देणार आहे.परंतु आपल्या राज्यात पत्नीच्या नावावर कमी तर पतीच्या नावावर जास्त कर्ज उचलले जाते. पत्नीच्या नावावर जमीन कमी असल्याने तिला मिळणारे पीककर्जही कमी असते. आता ते माफ झाले तरी शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांकडे पीककर्ज आणि दीर्घ मुदती कर्ज असे दोन प्रकारचे कर्ज थकीत आहे. त्यात एखाद्याकडे सहा लाख कर्ज असेल तर त्याला आधी साडेचार लाख स्वत: भरावे लागतील, तेव्हाच सरकार दीड लाखाचे कर्ज माफ करणार आहे. पण शेतकऱ्यांची तेवढी कुवत असती तर त्यांनी कर्जमाफी तरी मागितली असती का? शेतकऱ्यांच्या अशा उर्वरित साडेचार लाखांचे सरकारने बँकांकडे हप्ते पाडून मागितले आहेत. परंतु त्यासाठी बँका तयारच नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीतून कोणाचाही सातबारा कोरा होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.कराड येथून शेतकरी दिंडी२५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी कराड येथून आम्ही शेतकरी दिंडीचा आरंभ करणार आहोत. मात्र राज्यभरातील शेतकरी एकत्र झाल्यावर १ डिसेंबरला यवतमाळ येथून शेतकऱ्यांची ‘हल्लाबोल दिंडी’ निघेल. राज्यभरातून विविध मार्गाने येणारे शेतकरी वर्धा, अमरावती येथून दिंडीला येऊन मिळणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल दिंडी धडकणार आहे.

 

 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार