शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी काढणार हल्लाबोल दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 09:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेस येत्या नागपूर अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ काढणार आहे. त्यात राज्यभरातील त्रस्त शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशरद पवार यांचा निर्धार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागविणार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळालेला नसताना राज्य शासन कर्जमाफी केल्याची ‘मी लाभार्थी’ जाहिरात करीत आहे. ही फसवाफसवी आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस येत्या नागपूर अधिवेशनावर ‘हल्लाबोल दिंडी’ काढणार आहे. त्यात राज्यभरातील त्रस्त शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.बोंडअळीच्या आक्रमणाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यवतमाळात आले होते. त्यांनी नेर आणि कळंब तालुक्यातील शेतात जाऊन कापसाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विदर्भाचा दौरा करताना या सरकारवर लोकांची नाराजी स्पष्ट दिसली. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री वारंवार तारखा वाढवित आहेत. आतापर्यंत सहा परिपत्रके काढली. तरी अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. सरकार महिलेच्या नावावरील कर्जाला प्राधान्य देणार आहे.परंतु आपल्या राज्यात पत्नीच्या नावावर कमी तर पतीच्या नावावर जास्त कर्ज उचलले जाते. पत्नीच्या नावावर जमीन कमी असल्याने तिला मिळणारे पीककर्जही कमी असते. आता ते माफ झाले तरी शेतकऱ्यांना फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांकडे पीककर्ज आणि दीर्घ मुदती कर्ज असे दोन प्रकारचे कर्ज थकीत आहे. त्यात एखाद्याकडे सहा लाख कर्ज असेल तर त्याला आधी साडेचार लाख स्वत: भरावे लागतील, तेव्हाच सरकार दीड लाखाचे कर्ज माफ करणार आहे. पण शेतकऱ्यांची तेवढी कुवत असती तर त्यांनी कर्जमाफी तरी मागितली असती का? शेतकऱ्यांच्या अशा उर्वरित साडेचार लाखांचे सरकारने बँकांकडे हप्ते पाडून मागितले आहेत. परंतु त्यासाठी बँका तयारच नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीतून कोणाचाही सातबारा कोरा होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.कराड येथून शेतकरी दिंडी२५ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी कराड येथून आम्ही शेतकरी दिंडीचा आरंभ करणार आहोत. मात्र राज्यभरातील शेतकरी एकत्र झाल्यावर १ डिसेंबरला यवतमाळ येथून शेतकऱ्यांची ‘हल्लाबोल दिंडी’ निघेल. राज्यभरातून विविध मार्गाने येणारे शेतकरी वर्धा, अमरावती येथून दिंडीला येऊन मिळणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल दिंडी धडकणार आहे.

 

 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार