शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अविश्वास ठरावप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते विकले गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:43 IST

जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले.

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी ५९ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. यानंतर माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत निमिष मानकर यांच्यासह माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादीचे नेते विकले गेले, असा घणाघाती आरोप केला.

जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा देण्याचे घोषित केले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी केला. यानंतर भाजप-काँग्रेस व आम्ही सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. आमच्याकडे ३१ सदस्य झाले होते. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या उर्वरित दहा सदस्यांनीही सोबत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांना प्रत्येकी तीन लाख तर नेते असलेले आमदार मनोहरराव नाईक यांना २० लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप बाजोरिया यांनी केला. आता याच दहा सदस्यांनी राष्ट्रवादीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सदस्य व नेत्यांनी आपले पैसे परत करावे, असे आवाहनही बाजोरिया यांनी केले. 

नाईक यांच्या घरात अनेक वर्षे सत्ता असताना त्यांनी कोणत्याही जिल्हा परिषद व नगरपरिषद सदस्याला विकास निधी दिला नाही. उलट आपण आमदार असताना अनेक सदस्यांना विकास निधी दिल्याचे बाजोरिया यांनी सांगितले. यावेळी पायउतार झालेले बांधकाम सभापती निमिष मानकर यांनीही आपण गेली दोन वर्षे प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम केल्याचे सांगितले. विविध कामांमधील अनियमितता चव्हाट्यावर आणून त्याची तक्रार केल्याने आपल्याविरुद्ध अविश्वास आणला गेला, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, यापैकी पुसद विभागातीलच बहुतांश विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सोबतच तक्रार करू नये म्हणून आपल्यावर अनेकदा दडपण आणले गेले, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत अनियमितता होत होती. त्याला विरोध केला, तक्रारी केल्या म्हणूनच आपल्यावर अविश्वास ठराव आणला गेल्याचे त्यांनी सांगितले. अविश्वासाच्या चर्चेत आपल्याविरुद्ध वारंवार सदस्यांचा अपमान करतो, कामकाज चांगले नाही, असा आरोप करण्यात आला. मात्र त्यावर मुद्देसूद उत्तर कुणीही दिले नाही. शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी ३१ मार्चचा हिशेब ३१ मार्चलाच बंद केल्याचा आरोप चर्चेत केला होता. शासकीय नियमानुसार ३१ मार्चलाच सर्व हिशेब बंद होता, असेही मानकर यांनी सांगितले. 

आरोप अत्यंत चुकीचे - आमदार नाईकलोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्याविरोधात निमिष मानकर यांनी खुलेआम काम केले. त्याचवेळी त्यांना पक्षातून काढून टाकले. आता मानकर राष्ट्रवादीचे सदस्य नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले. पैशाचा आणि माझा काहीही संबंध नाही. नाईक हे पैसे घेणारे नाहीत. माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ