शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

जिल्हा परिषद अविश्वास ठरावप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते विकले गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:43 IST

जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले.

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी ५९ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. यानंतर माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत निमिष मानकर यांच्यासह माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादीचे नेते विकले गेले, असा घणाघाती आरोप केला.

जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा देण्याचे घोषित केले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी केला. यानंतर भाजप-काँग्रेस व आम्ही सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. आमच्याकडे ३१ सदस्य झाले होते. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या उर्वरित दहा सदस्यांनीही सोबत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांना प्रत्येकी तीन लाख तर नेते असलेले आमदार मनोहरराव नाईक यांना २० लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप बाजोरिया यांनी केला. आता याच दहा सदस्यांनी राष्ट्रवादीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सदस्य व नेत्यांनी आपले पैसे परत करावे, असे आवाहनही बाजोरिया यांनी केले. 

नाईक यांच्या घरात अनेक वर्षे सत्ता असताना त्यांनी कोणत्याही जिल्हा परिषद व नगरपरिषद सदस्याला विकास निधी दिला नाही. उलट आपण आमदार असताना अनेक सदस्यांना विकास निधी दिल्याचे बाजोरिया यांनी सांगितले. यावेळी पायउतार झालेले बांधकाम सभापती निमिष मानकर यांनीही आपण गेली दोन वर्षे प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम केल्याचे सांगितले. विविध कामांमधील अनियमितता चव्हाट्यावर आणून त्याची तक्रार केल्याने आपल्याविरुद्ध अविश्वास आणला गेला, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, यापैकी पुसद विभागातीलच बहुतांश विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सोबतच तक्रार करू नये म्हणून आपल्यावर अनेकदा दडपण आणले गेले, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत अनियमितता होत होती. त्याला विरोध केला, तक्रारी केल्या म्हणूनच आपल्यावर अविश्वास ठराव आणला गेल्याचे त्यांनी सांगितले. अविश्वासाच्या चर्चेत आपल्याविरुद्ध वारंवार सदस्यांचा अपमान करतो, कामकाज चांगले नाही, असा आरोप करण्यात आला. मात्र त्यावर मुद्देसूद उत्तर कुणीही दिले नाही. शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी ३१ मार्चचा हिशेब ३१ मार्चलाच बंद केल्याचा आरोप चर्चेत केला होता. शासकीय नियमानुसार ३१ मार्चलाच सर्व हिशेब बंद होता, असेही मानकर यांनी सांगितले. 

आरोप अत्यंत चुकीचे - आमदार नाईकलोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्याविरोधात निमिष मानकर यांनी खुलेआम काम केले. त्याचवेळी त्यांना पक्षातून काढून टाकले. आता मानकर राष्ट्रवादीचे सदस्य नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले. पैशाचा आणि माझा काहीही संबंध नाही. नाईक हे पैसे घेणारे नाहीत. माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ