शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, उमरखेडवर राष्ट्रवादीचा दावा

By admin | Updated: July 27, 2014 00:18 IST

काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीचा आधार घेऊन लोकसभेचे जागा वाटप केले होते. हाच निकष लक्षात घेतल्यास आता राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाय लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा

यवतमाळ : काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीचा आधार घेऊन लोकसभेचे जागा वाटप केले होते. हाच निकष लक्षात घेतल्यास आता राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाय लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा राज्यात राष्ट्रवादीने मिळविल्या आहे. याच निकषावर विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप व्हावे, अशी पक्षाची भूमिका आहे. यवतमाळ व उमरखेड विधानसभेबाबत स्थानिक कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यांची हीच भूमिका पक्षश्रेष्ठींपुढे ठेवून या मतदारसंघासाठी दावा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निर्धार मेळाव्याला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संधी हुकलेल्या मतदारसंघावर राष्ट्रवादी प्राधान्याने दावा करणार आहे. यवतमाळ जिल्हयतील केवळ एकमेव विधानसभा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. आणखी तीन मतदारसंघ देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लावून धरली आहे. याही मुद्यांचा विचार आघाडीतील जागा वाटपात करण्यात येणार आहे. आघाडीबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे मांडली आहे. आघाडी सन्मानपूर्वक व्हावी, अशी मागणीही आहे. या बाबत अंतिम निर्णय पक्षनेते शरद पवार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता या पत्रपरिषदेत वर्तविली. जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. राष्ट्रवादीला जागा वाढवून दिल्यानंतरच हे सूत्र ठरणार आहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिली. राष्ट्रवादीचा निर्धार मेळावाराष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस कमिटीचा निर्धार मेळावा येथील बलवंत मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विधानसभेत काँग्रेससोबत आघाडी कायम राहणार असून जागा वाढविण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. विधानसभेत राष्ट्रवादीच्या वाट्याला अधिक जागा निश्चितच येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लोकसभेत जे आक्रित घडले ते विधानसभेत थोपविण्यासाठी कामातून जनतेला आपलसं करा, बोलत असताना भान ठेवा, बेरजेच राजकारण करा, चुकलेल्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निर्धार मेळावा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने पाच वर्षात राष्ट्रवादीला अन्यायपूर्वक वागणूक दिली. प्रामाणिकपणे काम करूनही सन्मान मिळाला नाही. यापुढे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, नगराध्यक्ष सुभाष राय, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, वसंतराव घुईखेडकर, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, सुरेश लोणकर, उत्तमराव शेळके, जनाब इनायतुल्ला खान आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)