शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव मध्यम प्रकल्प तुडुंब

By admin | Updated: August 1, 2016 00:51 IST

गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे.

नागरिकांना दिलासा : वणीकरांची वर्षभराची तहान मिटली वणी : गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून वणीकरांची वर्षभराची तहान आता मिटली आहे. येथील नगरपरिषदेने आता स्वस्थ न बसता योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याची गरज भागविण्याच्या स्पर्धेमध्ये नगरपरिषद मागे पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वणीकरांची गरज ठरलेला नवरगाव प्रकल्प हा २७ जूलै रोजी १०० टक्के भरल्याची घोषणा पांढरकवडा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली. या जलाशयाची पातळी २४.१० मीटर एवढी वाढली असून पाणीसाठा १२.४७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे पाणीसाठा तपासला असता, ५ से.मी.पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू दिसला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी सर्वांना १० टक्के जादा पाणी देण्याचे ठरविले आहे. यावर्षी नगरपरिषदेने ४.७० दशलक्ष घ.मी. पाणी वणीकरिता घेतले असून वणी नगरपरिषदेने ८० टक्के पाण्याची परतफेड केली आहे. १० लाख रूपयांचा शेवटचा हप्ता थकीत आहे. राखीव पाण्यासाठी आॅक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पाणी राखीव करणे गरजेचे झाले आहे. येथील नगरपरिषदेला सध्या या धरणाच्या पाण्याची गरज नसून जिल्हा परिषदेच्या पाण्यानेच काम भागणार आहे. नवरगाव धरणामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात फक्त ५१.१४ टक्के पाणीसाठा होता. वणी नगरपरिषद, मारेगाव पाणी वितरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी वितरण या यंत्रणेकरिता हे पाणी आरक्षीत करण्यात आले होते. यामध्ये वणीसाठी २.२० द.घ.मी., मारेगाव ००.९९ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १.६५ द.घ.मी. पाणी आरक्षीत होते. या तीनही यंत्रणेनी व्यवस्थीत पाणी हाताळले, तर पाणी टंचाई जाणवणार नाही, याबाबत गेल्या १३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते. तसेच ९ एप्रिल रोजी ‘नवरगाव धरणात फक्त २५ टक्के जलसाठा’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर निर्गुडा नदीचे खोलीकरण करण्यास सुरूवात झाली व लोकसहभागातून एक महान कार्य करण्यात आले. परंतु वणीची पाणी समस्या कायमस्वरूपी केव्हा मिळणार, वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी जोर लावला. परंतु त्याला फारसे यश न आल्याने वर्धा नदीचे पाणी आरक्षीत करण्यासाठी आता जागा उरली नाही. याचे कारण वरोरा जवळील पंमले पॉवर स्टेशनला भरपूर पाणी लागते. त्यामुळे त्याने आपले आरक्षण जाहीर केले आहे. वरोरा शहराची तहान मिटविण्याकरिता पाटाळा या गावाजवळ बंधारा बांधून पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. आता समोर पाटाळा, गौराळा, नायगाव ही गावे आहे. त्यासमोर वेकोलीच्या कोळसा खाणी व जुनाडा घाटावर डिफेन्सने मोठा बंधारा बांधला आहे. मात्र वणी नगरपरिषद पाणी आरक्षीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकली नाही, हु दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आता वणी शहराला नवरगाव धरणावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने मोठी पाईपलाईन टाकून भविष्यासाठी पाण्यावर आपला दावा आत्ताच करणे गरजेचे झाले आहे. याठिकाणी अगदी धरणाच्या मुखावर विहिर आहे. तेथे मोटार बसवून व मारेगावला जाणारी वीज तेथे असल्याने काहीच अडथळा नाही. (प्रतिनिधी) धरणापासून पाईपलाईन टाकणे गरजेचे मोठी पाईपलाईन टाकून भविष्याचे पाणी आरक्षीत करणे अत्यंत गरजेचे आहे. वणीची तहान नवरगाव धरण दूर करणार की वर्धा नदी, याचे शासनाकडून समाधान होणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता वरिष्ठ नेत्यांनी शहराच्या कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे. आता नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून हा प्रश्न घेऊनच अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवतील. निवडून आल्यानंतर हा प्रश्न जो अनेक निवडणुकीमध्ये राजकीय मुद्दा असतो, तो तसाच राहून फक्त आपले पाच वर्ष कसे निघतात, हा मुख्य मुद्दा राहणार आहे.