शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नवरगाव धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:29 IST

वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

ठळक मुद्दे१९ टक्केच जलसाठा : रांगणा-भुरकीच्या पाण्याची वणीकरांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. वणीची तहान भागविण्याकरिता रांगणा-भुरकी घाटावरून पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने वर्धा नदीचेही पाणी वणीकरांना लवकर मिळण्याची आशा दिसत नाही.मे ते जूनपर्यंत नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडण्यासाठी २६.३० दलघमी पाणी मिळणे अपेक्षित आहे. १५ जानेवारी २०१८ मध्ये धरणात ५१.१४ टक्के जलसाठा होता. मात्र यावर्षी या धरणाची पातळी २५०.४० मीमी असून यात २.३७ दलघमी (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी नवरगाव धरणातून २० दलघमी पाणी सोडण्यात आले होते. परंतु हे पाणी जॅकवेलपर्यंत अल्प प्रमाणात पोहोचले.सध्या शहरात नगरपरिषदेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास २५ ते २६ ट्युबवेलद्वारे शहरात पाणी वितरणाचे काम सुरू आहे. तसेच तालुक्यातील राजूर पिटमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे वणीकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. वणीकरांची तहान भागविण्यासाठी शहरात २१ ट्युबवेल मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने निविदा काढली असून ही निविदा २ मे रोजी उघडण्यात येणार आहे.त्यामुळे या कामाला मंजुरात मिळाल्यानंतरही १० ते १५ दिवसानंतरच या ट्युबवेलच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या ट्युबवेलचे पाणीही मे महिन्यामध्येसुद्धा वणीकरांना मिळेल की नाही, अशी शंका उत्पन्न होत आहे.कालव्यालाही पडले भगदाडमारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील धरणातून वणीकरिता कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कॅनलला आता ठिकठिकाणी भगदाड पडले असून यातून पाणी बाहेर जात आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यानेही पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे वणीच्या निर्गुडा नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी पोहोचत नसून या कॅनलची दुरूस्ती करणे गरजेचे बनले आहे.