शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

नवरगाव धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:29 IST

वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

ठळक मुद्दे१९ टक्केच जलसाठा : रांगणा-भुरकीच्या पाण्याची वणीकरांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणीची जीवनदायीनी निर्गुडा नदी कोरडी पडली असून शहरात तीव्र पाणी टंचाईचे सावट पसरल आहे. त्यातच आता नवरगाव धरणानेही तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. वणीची तहान भागविण्याकरिता रांगणा-भुरकी घाटावरून पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने वर्धा नदीचेही पाणी वणीकरांना लवकर मिळण्याची आशा दिसत नाही.मे ते जूनपर्यंत नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडण्यासाठी २६.३० दलघमी पाणी मिळणे अपेक्षित आहे. १५ जानेवारी २०१८ मध्ये धरणात ५१.१४ टक्के जलसाठा होता. मात्र यावर्षी या धरणाची पातळी २५०.४० मीमी असून यात २.३७ दलघमी (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी नवरगाव धरणातून २० दलघमी पाणी सोडण्यात आले होते. परंतु हे पाणी जॅकवेलपर्यंत अल्प प्रमाणात पोहोचले.सध्या शहरात नगरपरिषदेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास २५ ते २६ ट्युबवेलद्वारे शहरात पाणी वितरणाचे काम सुरू आहे. तसेच तालुक्यातील राजूर पिटमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे वणीकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. वणीकरांची तहान भागविण्यासाठी शहरात २१ ट्युबवेल मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने निविदा काढली असून ही निविदा २ मे रोजी उघडण्यात येणार आहे.त्यामुळे या कामाला मंजुरात मिळाल्यानंतरही १० ते १५ दिवसानंतरच या ट्युबवेलच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या ट्युबवेलचे पाणीही मे महिन्यामध्येसुद्धा वणीकरांना मिळेल की नाही, अशी शंका उत्पन्न होत आहे.कालव्यालाही पडले भगदाडमारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील धरणातून वणीकरिता कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येते. मात्र या कॅनलला आता ठिकठिकाणी भगदाड पडले असून यातून पाणी बाहेर जात आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यानेही पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे वणीच्या निर्गुडा नदीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी पोहोचत नसून या कॅनलची दुरूस्ती करणे गरजेचे बनले आहे.