शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडेतून थेट वर्धा नदीत

By admin | Updated: December 25, 2015 03:28 IST

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडलेले लाखो गॅलन पाणी वाहून थेट वर्धा नदीला स्वाहा होत आहे.

पाणीटंचाईची झळ : प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षवणी : मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडलेले लाखो गॅलन पाणी वाहून थेट वर्धा नदीला स्वाहा होत आहे. याकडे प्रशासन तसेच गावकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदी काठावरील गावांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने निर्गुडा नदीने नोव्हेंबर महिन्यातच जीव सोडला. नदी काठावरील २१ गावे व वणी शहराची जीवनदायीनी असणारी ही नदी कोरडी पडल्याने हजारो नागरिकांना चिंता पडली. यावर्षी नवरगाव धरणात ८६ टक्के जलसाठा झाल्याने ही चिंता थोडी फार कमी झाली. तरीही नवरगाव धरणाचे पाणी पुढील सहा महिने पुरेल काय, याचा विचार होणे गरजेचे आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच धरणातून नदीत तीन वेळा पाणी सोडले गेले. मात्र सोडलेले पाणी अडवून धरण्यासाठी कुठेही बंधारा नाही. त्यामुळे लाखो गॅलन पाणी वर्धा नदीच्या पोटात शिरून वाया जात आहे. सोडलेल्या पाण्याचे पैसे पंचायत समिती किंवा नगरपरिषदेला भरावे लागणार आहे. त्यामुळे निधीचाही उपयोग होण्याची चिन्हे नाहीत. नदीत एकदा सोडलेले पाणी जास्तीत जास्त १५ दिवस प्रवाहित राहते. त्यानंतर पुन्हा नदीचा प्रवाह खंडित होऊन नदी कोरडी पडते. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर सोडलेले पाणी १५ दिवसही नदीत टिकत नाही. त्यामुळे प्रशासनाने धरणातील पाणी आरक्षित करून ठेवले, तरी जतनेची सहा महिने तहान भागविण्यासाठी पाणी अपुरे पडणार आहे. नवरगाव धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी मिळणे दुरापास्तच झाले आहे. नदीत सोडलेले पाणी किमान वनराई बंधारे बांधून जागोजागी अडविण्याची नितांत गरज आहे. कवडशीवासीयांनी हे पाऊल उचलले. नदीकाठावरील इतर गावांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनानेही पुढकार घेणे आवश्यक आहे. डॉ.श्रीकर परदेशी हे यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना वनराई बंधाऱ्यांची संकल्पना भरभराटीस आली होती. जिल्ह्यात जनतेच्या श्रमदानाने हजारो वनराई बंधारे बांधून त्यावेळी जलसंवर्धन करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षात वनराई बंधारा ही संकल्पना लुप्त होत असल्याचे दिसून येते. परिणामी जनतेला यावर्षी भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रशासन उपययोजनांकडे दुर्लक्ष करतानाच दिसत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)