शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

By admin | Updated: July 7, 2014 00:08 IST

निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे.

दुबार पेरणीचे संकट : आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेतवणी : निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे.मागीलवर्षी अतिवृष्टीने या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात सापडली होती़ अखेरच्या क्षणी पाऊस आल्याने हाता-तोंडाशी आलेला ाास हिरावला गेला होता. हातातील पीक वाया गेल्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाने नुकसान झाले, त्यांना शासनाकडून केवळ तुटपुंजीच मदत मिळाली़ त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. अनेकदा महसूल विभागाकडे निवेदन, तक्रारी देऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला अद्याप पदरात पडलाच नाही.मागीलवर्षीच्या धक्क्यातून कसेबसे सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने पेरणीच रखडली. ज्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटत आहे. परिणामी त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. कोरड्या दुष्काळाने शेतातील पिके नष्ट होत आहे़ त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातून कसे सावरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा झाल्याने जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ त्यांनी धावपळ करून लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केली. मात्र पेरणी झाल्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने आता पिके करपत आहेत. पेरणीचा खर्च पूर्णत: वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे़ ग्रामीण भागातील शेतकरी धार्मिक स्थळी जाऊन वरूण राजाला साकडे घालत आहे़ मात्र निसर्गाची अवकृपा कायम असल्याने शेतकरी आता धास्तावले आहेत़ पुढील वर्षात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे व घरचे मंगलकार्य पार पाडावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)