शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा

By admin | Updated: July 7, 2014 00:08 IST

निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे.

दुबार पेरणीचे संकट : आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेतवणी : निसर्गाचा लहरीपणा व अवकृपेने वणी, मारेगाव, झरीजामणी व पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी चांगलेच हैराण झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने आता त्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचे संकेत प्राप्त होत आहे.मागीलवर्षी अतिवृष्टीने या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात सापडली होती़ अखेरच्या क्षणी पाऊस आल्याने हाता-तोंडाशी आलेला ाास हिरावला गेला होता. हातातील पीक वाया गेल्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाने नुकसान झाले, त्यांना शासनाकडून केवळ तुटपुंजीच मदत मिळाली़ त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही. अनेकदा महसूल विभागाकडे निवेदन, तक्रारी देऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला अद्याप पदरात पडलाच नाही.मागीलवर्षीच्या धक्क्यातून कसेबसे सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने पेरणीच रखडली. ज्यांनी पेरणी केली, त्यांची पेरणी आता उलटत आहे. परिणामी त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. कोरड्या दुष्काळाने शेतातील पिके नष्ट होत आहे़ त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यातून कसे सावरावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा झाल्याने जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ त्यांनी धावपळ करून लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केली. मात्र पेरणी झाल्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने आता पिके करपत आहेत. पेरणीचा खर्च पूर्णत: वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे़ ग्रामीण भागातील शेतकरी धार्मिक स्थळी जाऊन वरूण राजाला साकडे घालत आहे़ मात्र निसर्गाची अवकृपा कायम असल्याने शेतकरी आता धास्तावले आहेत़ पुढील वर्षात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे व घरचे मंगलकार्य पार पाडावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)