शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: June 28, 2017 00:18 IST

आतापर्यंत केवळ नऊ टक्के पीक कर्ज वाटप करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना कारभार सुधारण्यासाठी आठवडाभराचा

कारभार सुधारा : शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आतापर्यंत केवळ नऊ टक्के पीक कर्ज वाटप करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना कारभार सुधारण्यासाठी आठवडाभराचा अल्टीमेटम मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आला. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला प्रामुख्याने उपस्थित होते. किशोर तिवारी यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाच्या गतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४८ टक्के कर्ज वाटप करू शकते तर तुम्ही अद्याप नऊ टक्क्यातच का असा प्रश्न या बँकांना विचारण्यात आला. त्यावर लिड बँक व्यवस्थापकांनी ‘आम्ही येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज देतोच, कुणालाही परत पाठवित नाही’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांशी बोलणे-वागणे योग्य नाही. त्यांना समजावून सांगितले जात नाही, त्यांच्या अडचणी सोडविल्या जात नसल्याच्या तक्रारी असल्याचे तिवारी यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपाची मंदावलेली गती वाढविण्यासाठी आणि रेंगाळलेला कारभार सुधारण्यासाठी या बँकांना आठवडाभराचा अवधी देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या बँकांच्या कर्ज वाटपाचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. दहा हजाराबाबत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपये उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश असले तरी स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे शासन स्तरावरून काय मार्गदर्शन येते याकडे प्रशासनाच्या नजरा लागल्या आहेत. त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल. १ जुलैपासून ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम राष्ट्रीय बँकांच्या संथगतीवर नाराज झालेल्या किशोर तिवारी यांनी या बँकांना १ जुलैपासून ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. गावागावात कॅम्प लावा आणि शेतकऱ्यांना बोलावून कर्ज वाटप करा, असे सांगण्यात आले. जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या कार्यक्षेत्रात आलेले नाही याकडेही बँकांचे लक्ष वेधण्यात आले. गेल्या वर्षी या योजनेचा दीड लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता.