शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज पुनर्गठणाचे आदेशच नाही !

By admin | Updated: May 28, 2016 02:23 IST

सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्णत्वाकडे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना या पुनर्गठणाचे अद्याप आदेशच प्राप्त झाले नाही.

लिड बँक मॅनेजरचा दिवसभर ‘नो-रिस्पॉन्स’संजय भगत महागाव सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्णत्वाकडे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना या पुनर्गठणाचे अद्याप आदेशच प्राप्त झाले नाही. एका बँकेच्या व्यवस्थापकानेच आढावा बैठकीत ही माहिती दिली. आता या बँकांना कर्ज वाटप व पुनर्गठणासाठी ३१ मेचा अल्टीमेटम देऊन फौजदारी कारवाईची तंबी शेतकरी मिशनने दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या वर्षी थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी पाच हप्ते पाडून दिले जात आहे. अर्थात त्यांना आपल्यावरील पीक कर्ज पुढील पाच वर्षात फेडायचे आहे. त्यावरील १२ टक्के व्याज शासन भरणार आहे. सहकारी बँकेत २० हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे. आठवडाभरात संपूर्ण पुनर्गठण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे पुनर्गठण अद्याप सुरूच झाले नाही. कारण काय तर या बँकांना अद्याप कर्ज पुनर्गठणाबाबत आदेशच प्राप्त झाले नसल्याची बाब पुढे आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथील विश्रामभवनावर आढावा बैठक घेतली. या वेळी कर्ज पुनर्गठणाचे आदेश नसल्याचे युनियन बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय युनियन व स्टेट बँकेने शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वाटप केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे तिवारी जाम भडकले. त्यांनी लगेच बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना संपर्क करून शेतकऱ्यांची अडवणूक न करता ३१ मेपूर्वी कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या. या काळात कर्ज पुनर्गठण व पीक कर्जाचे वाटप न झाल्यास फौजदारी गुन्हे नोंदविणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. कर्ज वाटपाची मंद गती कायमचराष्ट्रीयकृत बँकांना सुमारे १८०० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत केवळ २०० कोटींवर वाटप झाले आहे. अद्यापही कर्ज वाटपाची गती वाढलेली नाही. कर्ज वाटप व पुनर्गठणाच्या अधिकृत माहितीसाठी लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांच्याशी दिवसभर मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यंत्रणेची शेतकऱ्यांना उर्मट वागणूक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उर्मट वागणूक मिळत असल्याच्या जिल्हाभरातून तक्रारी आहे. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांकडे कायमच ‘थकबाकीदार’ या नजरेतून पाहिले जाते. सातबारा देऊनही शेतकऱ्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल राष्ट्रीयकृत ऐवजी जिल्हा सहकारी बँकेकडे अधिक आहे. मात्र प्रशासनाने गावे जोडून दिल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने राष्ट्रीयकृत बँकांची पायरी चढावी लागत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.