शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप केवळ नऊ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:15 IST

जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षी दोन हजार १६१ कोटी रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पेरणीपूर्वी हे १०० टक्के कर्ज वाटप करायचे असताना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरणात मागे पडल्या. या बँकांनी अत्यंत संथगतीने वाटप सुरू केल्याने अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्ट २१०० कोटींचे : वाटप ४१३ कोटी, पेरणीच्या तोंडावर शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षी दोन हजार १६१ कोटी रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पेरणीपूर्वी हे १०० टक्के कर्ज वाटप करायचे असताना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरणात मागे पडल्या. या बँकांनी अत्यंत संथगतीने वाटप सुरू केल्याने अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जापासून वंचित आहेत.दोन हजार १६२ कोटींचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत केवळ २३ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ९ टक्के कर्ज वितरित केले आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरणात हात आखडता घेत असल्याचे उघड झाले. विशेष म्हजे याच बँकाकडे सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी आहे. मात्र या बँका कुंणाचेही ऐकायला तयार नाही. यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ९.५८ टक्के कर्जाचे वितरण केले. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक शाखा असणाऱ्या स्टेट बँकेने कर्ज वितरणात आखडता हात घेतला सर्वाधिक शाखा असूनही या र्बंकेचे कर्ज वितरण अत्यंत कमी आहे. ही स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना पेरणी करणे अवघड होणार आहे. पाऊस आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. यातून कृषी अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाढली आहे.आत्तापर्यंत सर्वाधिक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. या बँकेला ५४४ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात बँकेने आत्तापर्यंत ३२७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने जवळपास ६० टक्के कर्ज वितरण केले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने उद्दीष्टाच्या केवळ १० टक्केच कर्जाचे वाटप केले. विशेष म्हणजे ज्या राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांच्या नावावर जाहिराती करतात, त्या बँकांनी केवळ ८६ कोटी रूपयांचेच कर्ज वितरित केले. या बँका शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना वालीच उरला नाहीपेरणी तोंडावर असून मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा स्थितीत ७७ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाचा छदामही जमा झाला नाही. गतवर्षीपासून कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. मात्र शेतकऱ्यांना आधार देणारा पाठीराखाच उरला नाही. सत्ताधारी लोकसभेच्या विजयात मश्गुल आहे, तर विरोधक चिंतन बैठकीत व्यस्त आहे. कुणीच शेतकºयांबद्दल अवाक्षरही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी झटणाºया संघटनाही दूरूनच तमाशा बघत आहे.मुख्यमंत्र्यांचा आदेश पायदळी तुडविलाराष्ट्रीयकृत बँकांनी गतवर्षी पेरणीपूर्वी ६ टक्केच कर्ज वितरण केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बँकांच्या तिजोरीवर टाच आणताच कर्ज वितरण वाढले होते. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी बँकांना तातडीने कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र त्यांच्या आदेशाला बँकांनी तूर्तास केराची टोपली दाखविल्याजे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँका ऐकत नसतील, तर वाटेल त्या मार्गाने त्यांना सरळ करण्याचा इशारा दिला होता. तरीही या बँका कर्ज वितरणाबाबत उदासीन आहे.

टॅग्स :bankबँक