शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

राष्ट्रीय महामार्ग केला १२ मीटरने अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटरने कमी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : इको सेन्सेटिव्ह झोनचा बाऊ करत किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी ३० मीटरवरून १८ मीटर करण्यात आली. या प्रश्नावर पुन्हा बैठक लावण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली आहे. नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटरने कमी करण्यात आली. ही बाब माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व पुसदचे उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवेदन स्वीकारून प्रश्न     निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष साजिद    खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, कचरू जोशी, रोहिदास जाधव आदींची उपस्थिती होती.

काही भागातच कमी केले अंतर, कारण काय?- किनवट शहरातून जाणारा हा मार्ग आयप्पा स्वामी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ३० मीटर रूंदीचा होणार आहे. मग जिजामाता चौक ते अशोक स्तंभ हा २०० मीटर लांबीचा रस्ता १८ मीटर रूंदीचा कसा, असा प्रश्न या प्रतिनिधी मंडळाने उपस्थित केला आहे. या मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या निवेदनावर मंजूर केलेल्या ठरावासंदर्भात पुन्हा योग्य पद्धतीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली.