शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नापिकीतही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर वसुलीचे भूत

By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार

के.एस. वर्मा - राळेगावतालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ३६ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेचे अधिकारी आता सज्ज झाले आहे. तालुक्याची आणेवारी ५० पैशाच्या आत आली असली तरी वसुली थांबविण्याबाबतचे आदेश बँकांना आलेले नाही. संस्था, शाखा, तालुका, जिल्हास्तरावर टॉप २५ थकीत सभासदांवर प्रथम प्राधान्याने कारवाई करण्याची तयारी झाली आहे. संबंधितांना या पूर्वीच विविध प्रकारच्या कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहे. थकीत सभासदांची जंगम, स्थावर मालमत्ता जप्ती, विक्री आणि विक्री न झाल्यास मालमत्तेची संस्थेच्या नावे फेरफार करून विक्री करणे आदी कारवाई यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ऊरात धडकी भरली आहे. सरासरी केवळ ४२ हजार रुपयांच्या वसुलीपोटी आता आपली इभ्रत चव्हाट्यावर येणार असल्याने शेतकरी आतल्या आत खचत चालला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी जप्ती, लिलाव, फेरफार आदी टोकाची कारवाई वेळोवेळी केली आहे. पण शेतकऱ्यांची म्हणविल्या जाणाऱ्या सहकारी बँकेने एवढे टोकाचे पाऊल पहिल्यांदाच उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये या बँकेचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. यावर्षी सोयाबीन एकरी क्विंटलने नव्हेतर किलोने झाले. कापसाचे उत्पादन जेमतेम आहे. भाव दबलेले आहे. या स्थितीत निवडणूक काळात काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सक्तीची वसुली थांबविण्याची विनंती केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडेही बँकेने दुर्लक्ष केले असल्याचे आतापर्यंतच्या हालचालीवरून दिसून येते. बँकेने कर्ज दिले ते वसूल करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यातच सहकार विभाग, सहकार विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यातच पहिल्या २५ टॉप सभासदांवर कारवाई सुरू करताच इतर थकीत संचालक मुकाट्याने बँकेची वसुली देतील, अशी चर्चा बँकेत दबल्या आवाजात सुरू आहे. राळेगाव तालुक्यात ४६ ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहे. या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (वसुली) संपर्क केला असता वसुली थांबविण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले.