शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीतही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर वसुलीचे भूत

By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार

के.एस. वर्मा - राळेगावतालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा पीक घेण्यासाठी लागलेला खर्चही निघाला नाही. अशाही स्थितीत जिल्हा बँकेकडून कर्जाची वसुली केली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील आठ हजार ७११ थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ३६ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेचे अधिकारी आता सज्ज झाले आहे. तालुक्याची आणेवारी ५० पैशाच्या आत आली असली तरी वसुली थांबविण्याबाबतचे आदेश बँकांना आलेले नाही. संस्था, शाखा, तालुका, जिल्हास्तरावर टॉप २५ थकीत सभासदांवर प्रथम प्राधान्याने कारवाई करण्याची तयारी झाली आहे. संबंधितांना या पूर्वीच विविध प्रकारच्या कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहे. थकीत सभासदांची जंगम, स्थावर मालमत्ता जप्ती, विक्री आणि विक्री न झाल्यास मालमत्तेची संस्थेच्या नावे फेरफार करून विक्री करणे आदी कारवाई यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ऊरात धडकी भरली आहे. सरासरी केवळ ४२ हजार रुपयांच्या वसुलीपोटी आता आपली इभ्रत चव्हाट्यावर येणार असल्याने शेतकरी आतल्या आत खचत चालला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी जप्ती, लिलाव, फेरफार आदी टोकाची कारवाई वेळोवेळी केली आहे. पण शेतकऱ्यांची म्हणविल्या जाणाऱ्या सहकारी बँकेने एवढे टोकाचे पाऊल पहिल्यांदाच उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये या बँकेचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. यावर्षी सोयाबीन एकरी क्विंटलने नव्हेतर किलोने झाले. कापसाचे उत्पादन जेमतेम आहे. भाव दबलेले आहे. या स्थितीत निवडणूक काळात काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सक्तीची वसुली थांबविण्याची विनंती केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडेही बँकेने दुर्लक्ष केले असल्याचे आतापर्यंतच्या हालचालीवरून दिसून येते. बँकेने कर्ज दिले ते वसूल करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यातच सहकार विभाग, सहकार विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यातच पहिल्या २५ टॉप सभासदांवर कारवाई सुरू करताच इतर थकीत संचालक मुकाट्याने बँकेची वसुली देतील, अशी चर्चा बँकेत दबल्या आवाजात सुरू आहे. राळेगाव तालुक्यात ४६ ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहे. या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (वसुली) संपर्क केला असता वसुली थांबविण्याबाबत कुठलेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले.