शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:09 IST

रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.

ठळक मुद्देरमजान ईद : देशात शांती, सुरक्षा, एकतेसाठी प्रार्थना, पोलिसांकडून गुलाबपुष्प भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या दुष्काळाने राज्यात पाच हजार टँकरच्या मदतीने पाणी वितरण केले जात आहे. अनेक गावांची तहान केवळ टँकरवरच अवलंबुन आहे. राज्यात भीषण स्थिती आहे. अशात पावसाळा लांबण्याचे संकेत हवामान खात्याने दिले. स्थिती अधिक बिकट होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पर्वावर संपूर्ण देशभरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून विशेष नमाज अदा केली. यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी मुबलक पावसासाठी अल्लाहला साकडे घालण्यात आले.येथील जामा मस्जीदचे इमाम मुफ्ती महंमद जाफीर कासमी यांच्या नेतृवात मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. देशात शांतीची प्रार्थना केली. रमजान ईदनिमित्त कळंब चौकात पोलीस बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प भेट दिले. यातून एकतेचा संदेश दिला. यवतमाळसह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.बाभूळगाव येथे ईद साजरीबाभूळगाव : पवित्र रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस विभागातर्फे मुस्लीम बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाहमध्ये नमाज पठन करून येणाऱ्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार सतीश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, प्रकाशचंद छाजेड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, प्रवीण तातेड, बल्लू जगताप, प्रकाश रत्ने, एच.पी. ठाकरे आदींनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.जकातने दिला अनेकांना मदतीचा हातमुस्लीम समाज बांधव समाजाप्रती देणे म्हणून उत्पन्नातील काही वाटा गोळा करतात. त्याला जकता म्हणून संबोधले जाते. ही जकात सामाजातील वंचित बांधवांना मदत म्हणून दिली जाते. जमा झालेली मदत ईद साजरी होण्यापूर्वी अनेक कुटुंबांना दिली गेली. एका समाज बांधवांने जकात देताना समाजातील गरीब परिवाराला मदत म्हणून बैलजोडी घेऊन दिली. या त्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला. दान देणाऱ्यांनी ‘गुप्तदान श्रेष्ठदान’ म्हणत आपले नाव गुप्त ठेवले.