शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:09 IST

रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.

ठळक मुद्देरमजान ईद : देशात शांती, सुरक्षा, एकतेसाठी प्रार्थना, पोलिसांकडून गुलाबपुष्प भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या दुष्काळाने राज्यात पाच हजार टँकरच्या मदतीने पाणी वितरण केले जात आहे. अनेक गावांची तहान केवळ टँकरवरच अवलंबुन आहे. राज्यात भीषण स्थिती आहे. अशात पावसाळा लांबण्याचे संकेत हवामान खात्याने दिले. स्थिती अधिक बिकट होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पर्वावर संपूर्ण देशभरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून विशेष नमाज अदा केली. यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी मुबलक पावसासाठी अल्लाहला साकडे घालण्यात आले.येथील जामा मस्जीदचे इमाम मुफ्ती महंमद जाफीर कासमी यांच्या नेतृवात मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. देशात शांतीची प्रार्थना केली. रमजान ईदनिमित्त कळंब चौकात पोलीस बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प भेट दिले. यातून एकतेचा संदेश दिला. यवतमाळसह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.बाभूळगाव येथे ईद साजरीबाभूळगाव : पवित्र रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस विभागातर्फे मुस्लीम बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाहमध्ये नमाज पठन करून येणाऱ्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार सतीश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, प्रकाशचंद छाजेड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, प्रवीण तातेड, बल्लू जगताप, प्रकाश रत्ने, एच.पी. ठाकरे आदींनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.जकातने दिला अनेकांना मदतीचा हातमुस्लीम समाज बांधव समाजाप्रती देणे म्हणून उत्पन्नातील काही वाटा गोळा करतात. त्याला जकता म्हणून संबोधले जाते. ही जकात सामाजातील वंचित बांधवांना मदत म्हणून दिली जाते. जमा झालेली मदत ईद साजरी होण्यापूर्वी अनेक कुटुंबांना दिली गेली. एका समाज बांधवांने जकात देताना समाजातील गरीब परिवाराला मदत म्हणून बैलजोडी घेऊन दिली. या त्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला. दान देणाऱ्यांनी ‘गुप्तदान श्रेष्ठदान’ म्हणत आपले नाव गुप्त ठेवले.