शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:09 IST

रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.

ठळक मुद्देरमजान ईद : देशात शांती, सुरक्षा, एकतेसाठी प्रार्थना, पोलिसांकडून गुलाबपुष्प भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या दुष्काळाने राज्यात पाच हजार टँकरच्या मदतीने पाणी वितरण केले जात आहे. अनेक गावांची तहान केवळ टँकरवरच अवलंबुन आहे. राज्यात भीषण स्थिती आहे. अशात पावसाळा लांबण्याचे संकेत हवामान खात्याने दिले. स्थिती अधिक बिकट होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पर्वावर संपूर्ण देशभरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून विशेष नमाज अदा केली. यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी मुबलक पावसासाठी अल्लाहला साकडे घालण्यात आले.येथील जामा मस्जीदचे इमाम मुफ्ती महंमद जाफीर कासमी यांच्या नेतृवात मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. देशात शांतीची प्रार्थना केली. रमजान ईदनिमित्त कळंब चौकात पोलीस बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प भेट दिले. यातून एकतेचा संदेश दिला. यवतमाळसह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.बाभूळगाव येथे ईद साजरीबाभूळगाव : पवित्र रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस विभागातर्फे मुस्लीम बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाहमध्ये नमाज पठन करून येणाऱ्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार सतीश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, प्रकाशचंद छाजेड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, प्रवीण तातेड, बल्लू जगताप, प्रकाश रत्ने, एच.पी. ठाकरे आदींनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.जकातने दिला अनेकांना मदतीचा हातमुस्लीम समाज बांधव समाजाप्रती देणे म्हणून उत्पन्नातील काही वाटा गोळा करतात. त्याला जकता म्हणून संबोधले जाते. ही जकात सामाजातील वंचित बांधवांना मदत म्हणून दिली जाते. जमा झालेली मदत ईद साजरी होण्यापूर्वी अनेक कुटुंबांना दिली गेली. एका समाज बांधवांने जकात देताना समाजातील गरीब परिवाराला मदत म्हणून बैलजोडी घेऊन दिली. या त्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला. दान देणाऱ्यांनी ‘गुप्तदान श्रेष्ठदान’ म्हणत आपले नाव गुप्त ठेवले.