शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:37 IST

एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले.

ठळक मुद्देप्रवाशांच दिवाळं : खासगी वाहतूकदारांची दिवाळी, एसटीच्या संपाने प्रवाशांवर संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले.एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी वेतनवाढ व विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला. शुक्रवारपर्यंत संपावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होत आहे. सर्वच बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांना प्रवास करण्यासाठी खासगीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या संधीचा लाभ घेत खासगी वाहतुकदारांनी दर वाढवित दिवाळी साजरी केली. सध्या खासगीचे दर गगनाला भीडले आहे. बसच्या तिकीटाच्या दुप्पट पैसे मोजून प्रवाशांना खासगी वाहनांत जनावरांप्रमाणे कोंबून प्रवास करावा लागत आहे.यवतमाळहून नागपूरचे एसटीचे प्रवास भाडे १४८ रूपये आहे. ते खासगी वाहतुकदारांनी चक्क ६०० रूपये केले असल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. अमरावतीचे भाडे १०२ रूपयांवरून २०० रूपये, तर घाटंजीचे तिकीट ५० रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचले आहे. आर्णीचे तिकीट ५० रूपयांवरून ८०, धामणगावचे भाडे १२० रूपयांच्या घरात पोहोचले आहे. वणीसाठी आता १०० ऐवजी २०० रूपये मोजावे लागत आहे. सर्वच गावांचे दर वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले. त्यात भाऊबिज करिता माहेरी जाण्यासाठी बस नसल्याने महिलांची अडचण झाली.एसटी कामगार संपावर ठाममागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. कर्मचाºयांच्या भूमिकेविरूद्ध सरकारने चुकीचे धोरण अवलंबिल्याचा आरोप महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे विभागीय सचिव स्वप्नील तगडपल्लेवार यांनी केला. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष राहुल धार्मिक यांनी कर्मचाºयांविरूद्ध परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भूमिका घेतल्याने संपकर्ते कर्मचारी नाराज असल्याचे स्पष्ट केले. सरकारने अंगणवाडीतार्इंबाबत जी आपुलकी दाखविली, तशी आपुलकी एसटी कर्मचाºयांबाबत दाखवायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.स्कूलबसचा पर्यायखासगी वाहतुकदारांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने यावर मात करण्यासाठी स्कूल बसचा पर्याय सुचविला. त्यासाठी सहा बस मागविण्यात आल्या. शनिवारी भाऊबीजेसाठी खास स्कूलबसची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. काही शाळांना बस मागणीचे पत्र पाठविण्यात आले. मात्र या शाळांनी पत्राला केराची टोपली दाखविली आहे. दुसरीकडे गत चार दिवसात जिल्ह्यात ३२०० बसफेºया रद्द झाल्याने महामंडळाचे सुमारे ८० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.