शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

देशभर विखुरलेल्या १३ कोटी बंजारांच्या एकतेचा ‘नगारा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:17 IST

सिंधु संस्कृतीशी नाळ सांगणारा प्राचीन बंजारा समाज आज देशभरात विविध राज्यात आणि विविध मागास प्रवर्गात विखुरला आहे.

यवतमाळ : सिंधु संस्कृतीशी नाळ सांगणारा प्राचीन बंजारा समाज आज देशभरात विविध राज्यात आणि विविध मागास प्रवर्गात विखुरला आहे. पण हे विखुरलेले १३ कोटी बंजारा बांधव सोमवारी महाराष्ट्रात एकवटले होते. आपली भाषा, आपली संस्कृती, आपली लोककला या सर्वांचे ऋण फेडण्यासाठी पोहरादेवीत ‘नगारा’ वास्तू उभी केली जात आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी ५ लाख बंजारा बांधवांनी एकत्र येऊन अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या समाज संस्कृतीचे असे संग्रहालय साकारण्याची जगातील अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे, हे विशेष.वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) हे श्रद्धास्थळ बंजारा समाजाची काशी समजली जाते. येथेच बंजारा संस्कृतीचे गतवैभव जपणारे नगारा या वाद्याच्या आकाराच्या आकाराचे वस्तूसंग्रहालय उभारले अहे.देशाच्या वेगवेगळ्या भूभागात वास्तव्य करणाऱ्या बांजारा समाजाचे एकत्र विराट दर्शन घडावे, ही समाजाची अनेक वर्षांची अभिलाषा होती. या अभिलाषेला राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्षात साकारले. सोमवारी ३ डिसेंबर रोजी झालेल्या नगारा भूमिपूजनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, आमदार मनोहरराव नाईक आणि कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाचे आमदारही पोहरागडावर आणले.पोहरादेवीचा विकास आराखडा १२५ कोटींचा आहे. त्यातले २५ कोटी शासनाने दिले, तर १०० कोटी देण्याची घोषणा केली. नॉनक्रिमिलिअरची अट वगळण्याची मागणी पुढे आली. ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी ऐरणीवर आली. वसंतराव नाईक महामंडळाला अध्यक्षच नसल्याची बाब प्रकर्षाने सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या सर्व मागण्यांमधून बंजारा विकासाच्या आकांक्षांचा आसमंत स्पष्ट झाला.