शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

नगर पंचायतचे कर्मचारी अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:11 IST

तालुकास्तरीय ग्रामपंचायतींना ८ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे

समायोजनच नाही : ग्रामपंचायतने ठरविलेल्या मानधनावरच कामगजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुकास्तरीय ग्रामपंचायतींना ८ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन पंचायतमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र कळंबसह जिल्ह्यातील एकाही कर्मचाऱ्यांचे यथायोग्य पदावर करण्यात आले नाही. ग्रामपंचायतने ठरवून दिलेल्या तुटपुंज्या मानधनावर शेकडो कर्मचारी आपला उदरनिर्वाह करत आहे. काही ठिकाणी समायोजनाची कार्यवाही प्रारंभ करण्यात आली. परंतु ती अन्यायकारक असल्याची बहुतांश कर्मचाऱ्यांची ओरड आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतमधील कर्मचारी संख्येच्या २० टक्के कर्मचाऱ्यांनाच समायोजनासाठी पात्र ठरविण्यात आले. उर्वरित ८० टक्के कर्मचाऱ्यांना अपात्र करण्यात आले. पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता लावून त्यांचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यात त्रुट्या असल्यास त्रुटी पूर्ण करण्याची कुठलीही संधी न देता अशा लोकांना सरळ शिपाई पदावर नेमणूक केली जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीपासून शिपाई पदावर असलेल्या लोकांना अपात्र ठरविले जात आहे. कर्मचाऱ्यांचे सरसकट समायोजन करावे, ज्या पदावर कार्यरत आहे त्याच पदावर समायोजन करण्यात यावे. त्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता नियुक्तीवेळेस निश्चित करण्यात आली होती तीच ग्राह्य धरावी. अथवा त्यांचे पूर्ततेसाठी कालावधी देण्यात यावा. पदांच्या आकृतिबंधात सुधारणा करावी, आदी मागण्या नगरपंचायत कर्मचारी कर्मचारी संघटनेकडून होत आहे.