शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाभूळगाव ग्रामपंचायत होणार नगरपंचायत

By admin | Updated: April 8, 2015 02:18 IST

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होणार असल्याच्या हालचालींना शासनस्तरावरून आता चांगलाच वेग आला आहे.

आरिफ अली  बाभूळगावग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होणार असल्याच्या हालचालींना शासनस्तरावरून आता चांगलाच वेग आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूरचे आयुक्त यांचे पत्र बाभूळगाव पंचायत समितीला प्राप्त झाले असून १ एप्रिलपासून मनरेगाच्या अपूर्ण असलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये काहीअंशी नाराजीचा सूर आहे. शासनाने धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम हाती घेतला असून शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात धडक सिंचन विहिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातील काही विहिरी मनरेगात वर्ग करण्यात आल्या आहे. बाभूळगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होत असल्याने गावात आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र आयुक्तांच्या या पत्रामुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून बाभूळगाव पंचायत समितीने मनरेगाच्या सर्व कामांना स्थगिती देत मस्टर काढणे बंद केले आहे. यामुळे तहसीलदार नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून जेव्हा काम हाती घेतली तेव्हाची ही कामे आता मार्गी लागणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.सध्या उन्हाळा असल्याने व प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांनी धुमधडाक्यात शेतातील विहिरींचे खोदकाम हाती घेतले आहे. सध्या सुरू असलेले विहिरींचे काम आयुक्तांच्या या पत्रामुळे बंद पडले असून नगरपंचायतीचे प्रशासक पदावर आल्यानंतर ही कामे केली जाणार असल्याने समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूरचे आयुक्त यांनी आपल्या पत्रात बाभूळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेली, मंजूर झालेली किंवा मंंजुरीसाठी शासन दरबारी पडून असलेली मनरेगाची कामे १ एप्रिल २०१५ पासून बंद करण्यात येणार असल्याने या निर्णयावरून दिसून येत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावीत, या कामांवर त्यानंतर महात्मा गांधी नरेगाचा निधी खर्च करण्यात येवू नये तसेच महात्मा गांधी नरेगातून नगरपंचायतीमध्ये नवीन कामे मंजूर करण्यात येवू नये, अपूर्ण कामांबाबतची पुढील कार्यवाही अधिकारी म्हणून तहसीलदार यांचेमार्फत अपेक्षित असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सध्या सुरू असलेली कामेही बंद पडली असून शेतकरी, शेतमजूर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. या कामावर असलेल्या मजुरांना आता इतरत्र भटकंती करावी लागत आहे.