शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

‘एनए’चा लाभ बिल्डरांनाच अधिक

By admin | Updated: July 18, 2014 00:19 IST

नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे.

नगरपरिषद क्षेत्र : यवतमाळ शहरात शेतकऱ्यांकडे जमिनी उरल्याच कुठे ? राजेश निस्ताने - यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे. कारण नगरपरिषद क्षेत्रात आता कुण्याही शेतकऱ्याच्या मालकीची जमीन शिल्लक नाही.त्यावर बिल्डरांनी केव्हाचा कब्जा केला आहे. शासनाने बुधवारी महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातून बिगरशेती परवाना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात हा निर्णय बिल्डरांच्याच हिताचा अधिक असल्याचे दिसून येते. कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. नगरपरिषद क्षेत्रात एक तर मोठ्या जागा अथवा शेती शिल्लक नाही. जी काही थोडीथोडकी शेती शिल्लक असेल ती आता शेतकऱ्याच्या मालकीची राहिलेली नाही. गब्बर राजकारणी, बिल्डर लॉबीने खूप आधी ती थोड्या पैशात शेतकऱ्यांकडून खरेदी केली. आज त्याच जमिनीचे भाव कितीतरी पटींनी वाढले आहेत. मंदी असूनही या जमिनींना मागणी असून भावही तेवढेच गगणाला भिडले आहे. शासनाच्या नगरपरिषद क्षेत्रातून एनए हद्दपारीच्या निर्णयाचा या जमिनीचे मालक असलेल्या बिल्डरांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी अकृषक परवान्याचे अधिकार महसूल विभागाकडे होते. त्यासाठी तब्बल २२ शासकीय विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक होते. त्यानंतर नगररचना विभागाची मोहर उमटत होती. तेव्हा कुठे अकृषक परवाना मिळत होता. हे सर्व दिव्य पार करताना जमीन मालकाला जागोजागी पैसा मोजावा लागत होता. त्यात मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्ची पडत होता. या सर्व कटकटीतून आता बिल्डरांची मुक्तता होणार आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्राचा विचार केल्यास शहरात शेती योग्य अगदी बोटावर मोजण्याएवढ्या जमिनी आहेत. त्यात यवतमाळ जिल्हा कारागृहाची बसस्थानक रोडवरील चार एकर जमीन आणि कृषी खात्याच्या गार्डन रोडवरील जमिनीचा समावेश आहे. याशिवाय धामणगाव रोडवर नागपूर बायपास परिसर, गिरजानगर, नारिंगेनगर या भागात काही प्रमाणात शेती आहे. परंतु धामणगाव रोडवरील सर्व शेती ही बिल्डर लॉबीच्या ताब्यात आहे. या जागेवर ले-आऊट थाटण्यासाठी अथवा बांधकाम करण्यासाठी या लॉबीला आता नगरपरिषद क्षेत्रात असल्याने अकृषक परवान्याची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी त्यांना केवळ नगरपरिषदेची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर त्याची माहिती एक महिन्याच्या आत महसूल खात्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या आधारे महसूल विभाग रुपांतर कर व बिनशेती कर आकारणी करणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात काही जमिनी सौंदर्यीकरण, तलाव अशा कामांसाठी आरक्षित केल्या जातात. या जमिनी नगरपरिषद खरेदी करेल असा करार असला तरी प्रत्यक्षात नगरपरिषदांची आर्थिक क्षमता नसल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाच्या नावाखाली या जमिनी तशाच पडून राहतात. आता अशा जमिनींसाठीही संबंधित मालकाला पर्यायी ठिकाणी एफएसआय वाढवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या या नव्या निर्णयाचा सामान्य नागरिकांना कमी आणि बिल्डर लॉबीलाच अधिक फायदा असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बिल्डर लॉबीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, त्यांना खूश करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.