शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘एनए’चा लाभ बिल्डरांनाच अधिक

By admin | Updated: July 18, 2014 00:19 IST

नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे.

नगरपरिषद क्षेत्र : यवतमाळ शहरात शेतकऱ्यांकडे जमिनी उरल्याच कुठे ? राजेश निस्ताने - यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातून एनए (अकृषक) हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा बिल्डर लॉबीलाच होणार आहे. या निर्णयाने ही लॉबी सुखावली आहे. कारण नगरपरिषद क्षेत्रात आता कुण्याही शेतकऱ्याच्या मालकीची जमीन शिल्लक नाही.त्यावर बिल्डरांनी केव्हाचा कब्जा केला आहे. शासनाने बुधवारी महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातून बिगरशेती परवाना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात हा निर्णय बिल्डरांच्याच हिताचा अधिक असल्याचे दिसून येते. कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत. नगरपरिषद क्षेत्रात एक तर मोठ्या जागा अथवा शेती शिल्लक नाही. जी काही थोडीथोडकी शेती शिल्लक असेल ती आता शेतकऱ्याच्या मालकीची राहिलेली नाही. गब्बर राजकारणी, बिल्डर लॉबीने खूप आधी ती थोड्या पैशात शेतकऱ्यांकडून खरेदी केली. आज त्याच जमिनीचे भाव कितीतरी पटींनी वाढले आहेत. मंदी असूनही या जमिनींना मागणी असून भावही तेवढेच गगणाला भिडले आहे. शासनाच्या नगरपरिषद क्षेत्रातून एनए हद्दपारीच्या निर्णयाचा या जमिनीचे मालक असलेल्या बिल्डरांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी अकृषक परवान्याचे अधिकार महसूल विभागाकडे होते. त्यासाठी तब्बल २२ शासकीय विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक होते. त्यानंतर नगररचना विभागाची मोहर उमटत होती. तेव्हा कुठे अकृषक परवाना मिळत होता. हे सर्व दिव्य पार करताना जमीन मालकाला जागोजागी पैसा मोजावा लागत होता. त्यात मोठ्या प्रमाणात पैसा आणि वेळ खर्ची पडत होता. या सर्व कटकटीतून आता बिल्डरांची मुक्तता होणार आहे. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्राचा विचार केल्यास शहरात शेती योग्य अगदी बोटावर मोजण्याएवढ्या जमिनी आहेत. त्यात यवतमाळ जिल्हा कारागृहाची बसस्थानक रोडवरील चार एकर जमीन आणि कृषी खात्याच्या गार्डन रोडवरील जमिनीचा समावेश आहे. याशिवाय धामणगाव रोडवर नागपूर बायपास परिसर, गिरजानगर, नारिंगेनगर या भागात काही प्रमाणात शेती आहे. परंतु धामणगाव रोडवरील सर्व शेती ही बिल्डर लॉबीच्या ताब्यात आहे. या जागेवर ले-आऊट थाटण्यासाठी अथवा बांधकाम करण्यासाठी या लॉबीला आता नगरपरिषद क्षेत्रात असल्याने अकृषक परवान्याची आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी त्यांना केवळ नगरपरिषदेची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर त्याची माहिती एक महिन्याच्या आत महसूल खात्याला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या आधारे महसूल विभाग रुपांतर कर व बिनशेती कर आकारणी करणार आहे. नगरपरिषद क्षेत्रात काही जमिनी सौंदर्यीकरण, तलाव अशा कामांसाठी आरक्षित केल्या जातात. या जमिनी नगरपरिषद खरेदी करेल असा करार असला तरी प्रत्यक्षात नगरपरिषदांची आर्थिक क्षमता नसल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाच्या नावाखाली या जमिनी तशाच पडून राहतात. आता अशा जमिनींसाठीही संबंधित मालकाला पर्यायी ठिकाणी एफएसआय वाढवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या या नव्या निर्णयाचा सामान्य नागरिकांना कमी आणि बिल्डर लॉबीलाच अधिक फायदा असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बिल्डर लॉबीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, त्यांना खूश करण्यासाठी तर हा निर्णय घेतला नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.