शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू

By admin | Updated: August 24, 2016 00:50 IST

मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली.

नांझाची घटना : एक जण अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सुरू कळंब : मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. कांताबाई किसन मसराम (५५), श्याम किसन मसराम (३५) अशी मृतांची नावे आहेत. रामभाऊ देवबा मसराम (५०) हे जखमी झाले. सदर तिघे शेतात खत देत होते. त्याचवेळी मधमाशांचा घोळका शेतात शिरला. तिघांवरही त्यांनी हल्ला चढविला. यातून सुटका करण्यासाठी रामभाऊ हा दूरवर जावून थांबला. मात्र कांताबाई आणि श्याम या दोघांनी शेतालगतच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र दोघेही गाळात फसल्याने मृत्यू पावले. जखमी रामभाऊला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कांताबाई किसन मसराम (५५), त्यांचा मुलगा श्याम किसन मसराम (३५) व नातेवाईक रामभाऊ देवबा मसराम (५०) यांचे नांझा शिवारात तीन एकर शेत आहे. हे तिघेही मंगळवारी सकाळी ६ वाजता पिकांना खत देण्यासाठी घरून निघाले. खत देत असताना सकाळी ९ वाजताच्या सुमारास दुसरीकडून उडत आलेल्या मधमाशांनी तिघांवरही अचानकपणे जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिघे घाबरले. या हल्ल्यातून वाचण्यासाठी कांताबाई व श्याम मसराम यांनी जवळच असलेल्या छोट्याशा तलावातील पाण्यात उडी घेतली. तलावातील पाण्यात बुडाल्यानंतरही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला. त्यामुळे मायलेकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. रामभाऊ मसराम यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतु मधमाशांच्या हल्यात तेही जखमी झाले. याप्रकरणीची कळंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मशमाशांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकामुळे शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)