शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मुलाचा भोसकून खून, वडिलांच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्देआर्णी तालुका : सुकळीतील किरकोळ वादाचे रक्तरंजित पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. तालुक्यातील सुकळी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. सूर्यकांत साहेबराव वारसवाड असे मृताचे नाव असून या हल्ल्यात सूर्यकांतचे वडील साहेबराव हे देखील गंभीर जखमी झाले आहे.या प्रकरणात आर्णी पोलिसांनी गणेश रामभाऊ मोरे (२६) आणि शुभम रामभाऊ मोरे (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वारसवाड आणि मोरे हे दोन्ही कुटुंब सुकळी येथे शेजारी राहतात. त्यांच्यात सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी गावकऱ्यांनी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.दरम्यान मृतक सूर्यकांत वारसवाड याची बहीण विद्या अर्जून घेरवाल (२५) हिने सोमवारी रात्रीच आर्णी पोलिसात घटनेबाबत तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी लगेच सुकळी गाठून दोन्ही आरोपी भावंडांना ताब्यात घेतले. तसेच हल्ल्यात वापरलेला चाकूसुद्धा जप्त केला. विद्याच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, ३०७, २९४, ५०४, ३४ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद उलेमाले, हेडकॉन्स्टेबल अरुण पवार, संजय भारती, गजानन खांदवे, संदीप गोहणे, महेश बाडेलवार तपास करीत आहे.लॉकडाऊनमुळे गाव भांडणापासून अनभिज्ञकोरोना प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. खुनाची घटना घडली त्यावेळी सुकळी गावातही सर्वत्र सामसूम होती. त्यामुळेच एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाल्यावरही गावकऱ्यांना घटनेची माहिती उशिरा कळली. गावात नेहमीप्रमाणे वर्दळ असती तर कदाचित हे भांडण विकोपाला जाण्यापूर्वीच कुणी तरी मध्यस्थी करून सोडविले असते, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस गावात पोहोचल्यावरही आरोपी अरेरावी करीत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून