शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा भोसकून खून, वडिलांच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्देआर्णी तालुका : सुकळीतील किरकोळ वादाचे रक्तरंजित पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. तालुक्यातील सुकळी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. सूर्यकांत साहेबराव वारसवाड असे मृताचे नाव असून या हल्ल्यात सूर्यकांतचे वडील साहेबराव हे देखील गंभीर जखमी झाले आहे.या प्रकरणात आर्णी पोलिसांनी गणेश रामभाऊ मोरे (२६) आणि शुभम रामभाऊ मोरे (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वारसवाड आणि मोरे हे दोन्ही कुटुंब सुकळी येथे शेजारी राहतात. त्यांच्यात सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी गावकऱ्यांनी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.दरम्यान मृतक सूर्यकांत वारसवाड याची बहीण विद्या अर्जून घेरवाल (२५) हिने सोमवारी रात्रीच आर्णी पोलिसात घटनेबाबत तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी लगेच सुकळी गाठून दोन्ही आरोपी भावंडांना ताब्यात घेतले. तसेच हल्ल्यात वापरलेला चाकूसुद्धा जप्त केला. विद्याच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, ३०७, २९४, ५०४, ३४ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद उलेमाले, हेडकॉन्स्टेबल अरुण पवार, संजय भारती, गजानन खांदवे, संदीप गोहणे, महेश बाडेलवार तपास करीत आहे.लॉकडाऊनमुळे गाव भांडणापासून अनभिज्ञकोरोना प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. खुनाची घटना घडली त्यावेळी सुकळी गावातही सर्वत्र सामसूम होती. त्यामुळेच एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाल्यावरही गावकऱ्यांना घटनेची माहिती उशिरा कळली. गावात नेहमीप्रमाणे वर्दळ असती तर कदाचित हे भांडण विकोपाला जाण्यापूर्वीच कुणी तरी मध्यस्थी करून सोडविले असते, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस गावात पोहोचल्यावरही आरोपी अरेरावी करीत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून