शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

हद्दीलगतची गावे लवकरच महापालिकेत

By admin | Updated: March 28, 2017 02:48 IST

हद्दीलगतच्या ३४ गावांत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तेथील कचरा, रस्ते, पाणी हे प्रश्न

धायरी : हद्दीलगतच्या ३४ गावांत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तेथील कचरा, रस्ते, पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी ही गावे महापालिकेत यावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले. हद्दीलगतच्या ३४ गावांतील अवैध बांधकामे पाडण्यासाठी पीएमआरडीएने कठोर पावले उचलली आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक व घरमालकांना नोटिसा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर येथील दत्तकृष्णाई मंगल कार्यालयात भाजपातर्फे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांचा सर्वपक्षीय मेळावा आयोजिण्यात आला. त्या वेळी तापकीर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, जयश्री भूमकर, पंचायत समिती सदस्या वैशाली पोकळे, फुलाबाई कदम, नगरसेवक हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, नीता दांगट, राजश्री नवले, बाळासाहेब नवले, बाळासाहेब पोकळे, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवांडे, अरुण दांगट, बाळासाहेब जाधव, सचिन चव्हाण, विशाल कदम, दामोधर बांदल, रुपेश घुले व संयोजक गंगाधर भडावळे, किशोर पोकळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात परिसरात बांधकाम व्यावसायिक व गुंठा दोन गुंठ्यांत घरे बांधलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएमआरडीएने पाठवलेल्या नोटिसांना कायदेशीरपणे उत्तर द्यावे लागेल व ही कामे नियमित कशी करता येतील, यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल, असे तापकीर यांनी सांगितले. नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, की ३४ गावांतील ही बांधकामे अवैध नाहीत. ग्रामपंचायतीच्या परवानगीनेच ही बांधकामे झाली आहेत. आता ही गावे पीएमआरडीएच्या अखत्यारित असल्याने ही कामे अवैध ठरवली जात आहेत. त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने दंड भरून ही कामे नियमित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, मात्र यापुढे अवैध कामे होणार नाहीत, याचीही आपणाला काळजी घ्यावी लागेल. राजाभाऊ लायगुडे यांनीही हा प्रश्न मनापासून हद्दीत ही गावे घेऊन सोडवता येऊ शकेल. त्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. राजवाडे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)नागरी सुविधाही हव्यातअवैध बांधकामांमुळे नाही, तर नागरी सुविधांसाठी ही ३४ गावे मनपा हद्दीत यावीत, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच निर्णय शासनाला घ्यावा लागेल. त्यामुळे अवैध बांधकामाचाही प्रश्न सुटेल, यासाठी आमचा लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.