शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पूस नदीपात्रात पालिकेची सफाई मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:00 IST

आॅनलाईन लोकमतपुसद : अपुऱ्या पावसामुळे यंदा पुसदकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुसद नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळील पूस नदीवरील बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविणे होय. त्यासाठी सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.शहराला ...

ठळक मुद्देपाणीटंचाई : गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ, बंधाºयाच्या साठवण क्षमता वाढीवर भर

आॅनलाईन लोकमतपुसद : अपुऱ्या पावसामुळे यंदा पुसदकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुसद नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळील पूस नदीवरील बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविणे होय. त्यासाठी सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे या धरणात केवळ १५-२० टक्केच पाणीसाठा आहे. जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. परंतु त्यानंतरही धरणातील पाणी आटले तर काय? म्हणून पूस नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पूस धरणातून पुसदकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडल्यानंतर पूस नदीतून ते जलशुद्धीकरण केंद्राच्या बंधाऱ्यात अडविले जाते. हा बंधारा पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा होईल, या दृष्टीने नगराध्यक्ष अनिता नाईक, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांच्या पुढाकारात पूस नदी स्वच्छता मोहीम व बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण आदी कामांना प्रारंभ केला आहे. तीन जेसीबी मशीन व मजुरांच्या माध्यमातून या बंधाºयाची साठवण क्षमता वाढविणार आहे. पूस धरणातून महिन्यात एकदा नदीत पाणी सोडावे लागेल. एक महिना साठवण केलेले पाणी पुसदकरांना पुरवठा करता येईल. वारंवार धरणातून पाणी सोडल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत होता. आता त्याला आळा बसणार व पाण्याची बचत होवून उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.