शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

खासदार, आमदारांचा ‘वट’ यंत्रबंद

By admin | Updated: February 23, 2017 01:01 IST

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन

निकालाची उत्सुकता : मिनी मंत्रालय कोण सर करणार, विजयाचे दावे-प्रतिदावे सुरूच रवींद्र चांदेकर   यवतमाळ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन खासदार अन् १३ आमदारांचा ‘वट’ नागरिकांना कळणार अहे. सर्व पक्ष, त्यांचे नेते, मंत्री, खासदार, आमदारांनी निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. आपापल्या प्रभावक्षेत्रातील आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. काही गटांमध्ये राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभा झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. आता या सर्व नेते, लोकप्रतिनिधींचा मतदारांवर किती प्रभाव पडला, हे जनतेला कळून चुकणार आहे. मतदान पार पडताच सर्वच पक्ष विजयाचे दावे करीत सुटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही मुख्य पक्ष विजयाचा दावा ठोकत आहे. बहुमत आमचेच, असा घोषा त्यांनी लावला आहे. मात्र मतदार राजाने नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते उद्याच कळणार अ‍ोहे. मतमोजणी पूर्णत्वास जातपर्यंत प्रत्येक पक्ष व नेते विजयाचे दावे करतील. मात्र उद्या सर्वांचीच पोलखोल होणार आहे. मतदारांनी नेमका काय कौल दिला, हे स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्वच पक्ष, उमेदवार आणि नेते विजयाचे स्वप्न रंगवीत राहतील. ग्रामीण मतदारांनी आपला हक्क बजावताना सर्व पक्ष व नेत्यांच्या आश्वासनांचा लेखाजोखा नजरेसमोर ठेवून कर्तव्य पार पाडले. त्यांना विजयाचा अदमासही आहे. मात्र मतदार राजा चुप्पी साधून आहे. लोकप्रतिनिधींची कसोटी ४मतमोजणीअंती जिल्ह्याला लाभलेल्या तीन खासदार अन् १३ आमदारांचा वकूब जिल्ह्यातील जनतेला कळणार आहे. जिल्ह्याला तीन खासदार लाभले. विधानसभेचे सात व विधानपरिषदेचे तब्बल सहा आमदार लाभले. यात अहीर केंद्रात राज्यमंत्री आहे. तीन आमदार मदन येरावार, संजय राठोड व डॉ. रणजित पाटील राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहेत. उर्वरित नऊ आमदारांमध्ये मनोहरराव नाईक, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, राजू तोडसाम, श्रीकांत देशपांडे, ख्याजा बेग, तानाजी सावंत आदींचा समावेश आहे. या लोकप्रतिनिधींचा जिल्ह्यात किती ‘वट’ आहे, हे मतमोजणी अंती दिसून येणार आहे.