शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:12 IST

येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देनगदी पिकात तोटा : शोध लावणाऱ्या कदंबनगरीचे वास्तव

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील पवित्र अशा श्री चिंतामणीनगरीत गृत्स्मद ऋषीने कापसाचा शोध लावला. यासंदर्भात पुरणातही नोंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक होते. परंतु आता कापसाच्या पंढरीतच शेतकऱ्यांची पुरती वाताहात व्हायला सुरुवात झाली आहे.विदर्भातील शेतकऱ्यांचे कापूस हे मुख्य पीक आहे़ पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणूनही विदर्भाकडे पाहिले जाते़ नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणूनही कापसाच्या पिकाची ओळख आहे़ परंतु मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता कापूस हे अनिश्चितेचे पीक झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे़ काही वर्षापूर्वी कापसाला सात हजारापर्यंत भाव मिळाला होता़ परंतु नजीकच्या काळात कापसाचे भाव कमालीचे कोसळले़ बोंडअळी व इतर रोगांनी कपाशीची वाट लागली. संपूर्ण पीक अळीने फस्त केले. शेतकरी दशोधडीला लागला. या सर्व प्रकाराला शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकºयांतून होत आहे़ पीक उत्पन्नासाठी लागणरे पैसेही निघत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़यापूर्वी कापसाचा भाव सात हजारापर्यंत गेला होता़ त्यामुळे त्याच्या आसपास भाव मिळतील या एकमेव आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करतात. परंतु दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. यावर्षी सुरुवातीला तर साडेतीन ते चार हजारापर्यंतच शेतकऱ्यांना कापूस विकाला लागला. किती दिवस कापूस घरामध्ये ठेऊन जपायचा, याच विचारात शेतकरी वर्ग दिसू येतो़ शेतकऱ्यांजवळचा कापूस संपल्यानंतर भाववाढ होते. याला कुठे तरी आळा घालणे गरजेचे आहे.शेतीपयोगी साहित्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे़ औषध-बियाण्यांच्याही किंमती आकाशाला भिडल्या आहे़ परंतु कापसाचा भाव पाहिला तर उत्पादनासाठी लागलेला खर्चही निघत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जीवनाचे रहाटगाडगे कसे चालवावे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे़बाजारपेठेतही कापसाला भावाचा डंखआधीच यावर्षी कापसाला समाधानकारक भाव मिळाला नाही़ त्यातल्या त्यात शासनाच्या धोरणामुळे भाव वर-खाली होत असतात़ त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना नुकसान तर व्यापाºयांचा मात्र फायदा होतो, अशी अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.