शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या भावंडांच्या मृत्यूने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:14 IST

अधिकमासात कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या जुळ्या भावंडांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच ....

बुडून मृत्यू : वार्ता ऐकताच आई बेशुद्ध यवतमाळ : अधिकमासात कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या जुळ्या भावंडांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच संपूर्ण माळीपुऱ्यात शोककळा पसरली. मुलांच्या मृत्यूची माहिती मिळताच आई बेशुद्धच पडली. घरापुढे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक जण या घटनेने हळहळताना दिसत होता. यवतमाळच्या माळीपुरात राहणाऱ्या उमेश गोठे यांचे जय आणि निहाल ही दोन जुळी मुली रविवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे अधिकमासानिमित्त दर्शनासाठी गेले होते. वर्धा नदीच्या कुंडात पोहताना जय पाण्यात बुडायला लागला. त्याच्या मदतीसाठी त्याचा भाऊ निहाल गेला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असावे. या दोनही जुळ्या भावंडांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून रविवारी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. या घटनेची वार्ता माळीपुऱ्यात धडकताच कुणाचाही विश्वास बसत नव्हता. कालपर्यंत हसत खेळत असलेली भावंडं आज मृत्युमुखी पडली यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. नागरिकांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली होती. निहाल आणि जय ही जुळी भावंड नदीत बुडाल्याची माहिती कुणी तरी भीत भीत आई शारदाला दिली. ही वार्ता ऐकताच शारदाबाई बेशुद्ध पडली. तर वडिलांनी काही नातेवाईकांना घेऊन कोटेश्वरकडे धाव घेतली. निहाल आणि जयचे वडील उमेश गोठे एका ज्वेलर्समध्ये गठाईचे काम करतात. परिसरात हे दोघे भाऊ मनमिळावू म्हणून ओळखले जायचे. कुणीही काम सांगितले की, चट्टदिशी करायचे. त्यामुळे त्यांच्यावर या परिसरातील नागरिकांचा विशेष लळा होता. रविवारी या दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. वृत्तलिहिस्तोवर दोघांचीही प्रेते यवतमाळात आली नव्हती. परंतु घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी दिसत होती. (शहर वार्ताहर)दोघेही झाले होते दहावीची परीक्षा उत्तीर्णनिहाल आणि जय गोठे या जुळ्या भावंडांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत चांगले मिळविले होते. निहालला ५२ तर जयला ५३ टक्के गुण मिळाले होते. हे दोघेही यवतमाळच्या शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रवेशासाठी आयटीआयसह महाविद्यालयात प्रवेशासाठी त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अद्याप त्यांचा प्रवेश झाला नव्हता. विशेष म्हणजे जय हा सकाळी शहरात वृत्तपत्र वितरणाचे काम करीत होता. तर निहाल यवतमाळच्या एका ज्वेलर्समध्ये काम करीत होता. रविवारी सकाळी ते कोटेश्वरला गेले आणि परतच आले नाही.