शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

शस्त्राच्या धाकावर माहेरच्यांनी विवाहितेला पळविले

By admin | Updated: November 2, 2014 22:39 IST

प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला

यवतमाळ : प्रेमात आणाभाका घेऊन एकाच कंपनीत कार्यरत तरुण आणि तरुणीने सहा महिन्यांपूर्वी विवाह केला. याची कुणकुण लागताच माहेरच्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच तरुणाला मारहाण करून शस्त्राच्या धाकावर विवाहित तरुणीला पळविले. ही घटना येथील सुरजनगरात घडली. घटनेनंतर सदर तरुणाने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी अपहरणाऐवजी धमकाविल्याचा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यामुळे या विवाहित प्रेमीयुगुलाची ताटातूट झाल्याचा आरोप होत आहे.सुरेखा (२०) रा. नळेगाव (लातूर) असे प्रेम प्रकरणातून विवाहबद्ध झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संतोष अशोक ढोक (२५) रा. सुरजनगर असे तिच्याशी विवाहबद्ध झालेल्या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथे एका कंपनीत कार्यरत असताना दोघांचे परस्परावर प्रेम जडले. त्यांनी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यातूनच २६ जून २०१४ ला त्यांनी जालना येथील आर्य समाज या संस्थेत विधिवत विवाह केला. या विवाहाला माहेरचे विरोध करतील याची पूर्वकल्पना सुरेखाला होती. त्यामुळे तिने ही बाब माहेरच्या मंडळींपासून लपवून ठेवली. दरम्यान २८ आॅक्टोबरला ती संतोषसोबत संसार थाटण्यासाठी यवतमाळला आली. त्यापूर्वी तिने मोबाईलवरुन माहेरच्यांना विवाहाची कल्पना दिली. त्यावरून माहेरची मंडळी संतप्त झाली. त्यांनी वाहनाद्वारे यवतमाळ गाठले. तसेच घरी जाऊन संतोषला घातक शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर संधी साधून सुरेखाला वाहनात घेऊन पसार झाले. घटनेनंतर संतोषने वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. मात्र या वेळी त्याची तक्रार घेतल्या गेली नाही. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांची भेट घेतली. यावेळी ठाणेदार जाधव यांनी घटनास्थळाचे कारण पुढे केले. तरी देखील मदत करायची म्हणून थातूरमातूर कारवाई केली. त्यामध्ये ५०६ कलमान्वये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद घेतली. त्यापुढे कारवाई सरकलीच नाही. त्यामुळे या प्रेमीयुगुलाची विवाहानंतरही ताटातूट झाली. (स्थानिक प्रतिनिधी)