शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

By admin | Updated: May 27, 2015 02:16 IST

जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. पंधरा वर्षात तीन हजार १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी ३१ ते ४५ वयोगटातील तब्बल एक हजार १२२ शेतकरी होते. या वयोगटातील शेतकऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडत असल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते ११ मे २०१५ पर्यंत ३१८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी एक हजार २२६ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून १९१९ प्रकरणे अपात्र ठरले आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने शेतकरी कुटुंंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा ताजा अहवाल विभागीय आयुक्तांना नुकताच सादर करण्यात आला असून त्यात आत्महत्येचे कारण, वयोगट, जातीनिहाय आत्महत्या, कर्जाची रक्कम आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते ३० वयोगटातील ७७६, ४६ ते ५५ वयोगटातील ६८८, ५५ ते ६५ वयोगटातील ३५१ आणि ६५ च्यावर वयोगटातील २०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच आत्महत्येच्या कारणांमध्ये सर्वाधिक कारण हे कर्जबाजारीपणा असल्याचे दिसून आले. ९२५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. तर दहा ते २५ हजार कर्ज असलेल्या ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ४० हजाराच्या वर कर्ज असणाऱ्यांची संख्या ५०३ आहे. आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून सर्वेक्षणातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)