शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

By admin | Updated: May 27, 2015 02:16 IST

जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. पंधरा वर्षात तीन हजार १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी ३१ ते ४५ वयोगटातील तब्बल एक हजार १२२ शेतकरी होते. या वयोगटातील शेतकऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडत असल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते ११ मे २०१५ पर्यंत ३१८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी एक हजार २२६ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून १९१९ प्रकरणे अपात्र ठरले आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने शेतकरी कुटुंंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा ताजा अहवाल विभागीय आयुक्तांना नुकताच सादर करण्यात आला असून त्यात आत्महत्येचे कारण, वयोगट, जातीनिहाय आत्महत्या, कर्जाची रक्कम आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते ३० वयोगटातील ७७६, ४६ ते ५५ वयोगटातील ६८८, ५५ ते ६५ वयोगटातील ३५१ आणि ६५ च्यावर वयोगटातील २०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच आत्महत्येच्या कारणांमध्ये सर्वाधिक कारण हे कर्जबाजारीपणा असल्याचे दिसून आले. ९२५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. तर दहा ते २५ हजार कर्ज असलेल्या ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ४० हजाराच्या वर कर्ज असणाऱ्यांची संख्या ५०३ आहे. आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून सर्वेक्षणातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)