शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खैरी येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: June 8, 2015 00:09 IST

तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली.

दोन शेतमजुरांनी संपविले जीवन : नऊ महिन्यात सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेराळेगाव : तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली. शासनाच्या रेकॉर्डमध्येही गत पाच वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याची दहेगाव व खैरीची नोंद आहे. जवळच्या दहेगाव येथे सात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.८ जून २०१४ ते २२ मार्च २०१५ या केवळ नऊ महिन्यातील आत्महत्यांनी या ३५०० लोकसंख्येच्या गावात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यभान खंगार (५५), मनोज महाजन (४५), मोरेश्वर निवल, गजानन हरबडे (शेतमजूर) यांनी गळफास लावून, हनुमान राऊत (२९), अमोल खैरकार (३०), अनिल नारनवरे (शेतमजूर) यांनी विषारी औषध घेवून, तर साईनाथ दोडके (२०), चांगुनाबाई नरांजे यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. यातील बहुतांश शेतकरी तरुण होते. मनोज बाबाराव महाजन हा ४५ वर्षीय शेतकरी कृषी पदवीधर होता, हे विशेष. तरुण व शिक्षित मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने चिंतेचा नवा विषय समोर आला आहे.राळेगाव उपविभागात गेली पाच वर्षात राळेगाव तालुक्यातील दहेगावात सात, खैरी चार, सरई चार, झाडगाव सहा, कळंब तालुक्यातील तिरझडा येथे आठ, कळंब सात, कोठा सहा, परसोडी तीन, अंतरगाव तीन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचा महसूल विभागाचा अहवाल आहे. या सर्व फक्त पात्र शेतकरी आत्महत्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे यामागे असल्याचा शासनाचा अहवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत आमदारांना प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन गावे २०१९ पर्यंत आदर्श करावयाची आहे. त्यासाठी गावांची शिफारस आमदारांकडून शासनाने मागितली आहे. खैरी ३५२८, दहेगाव २२०२, कळंब तालुक्यातील तिरझडा १८०० याप्रमाणे लोकसंख्या असलेल्या शेतकरी आत्महत्येने पीडित आणि जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या या गावांची निवड करून येथील लोकांना दिलासा आणि मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी आमदार आदर्श गाव योजना संजीवनी ठरू शकते.