शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खैरी येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: June 8, 2015 00:09 IST

तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली.

दोन शेतमजुरांनी संपविले जीवन : नऊ महिन्यात सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेराळेगाव : तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली. शासनाच्या रेकॉर्डमध्येही गत पाच वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याची दहेगाव व खैरीची नोंद आहे. जवळच्या दहेगाव येथे सात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.८ जून २०१४ ते २२ मार्च २०१५ या केवळ नऊ महिन्यातील आत्महत्यांनी या ३५०० लोकसंख्येच्या गावात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यभान खंगार (५५), मनोज महाजन (४५), मोरेश्वर निवल, गजानन हरबडे (शेतमजूर) यांनी गळफास लावून, हनुमान राऊत (२९), अमोल खैरकार (३०), अनिल नारनवरे (शेतमजूर) यांनी विषारी औषध घेवून, तर साईनाथ दोडके (२०), चांगुनाबाई नरांजे यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. यातील बहुतांश शेतकरी तरुण होते. मनोज बाबाराव महाजन हा ४५ वर्षीय शेतकरी कृषी पदवीधर होता, हे विशेष. तरुण व शिक्षित मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने चिंतेचा नवा विषय समोर आला आहे.राळेगाव उपविभागात गेली पाच वर्षात राळेगाव तालुक्यातील दहेगावात सात, खैरी चार, सरई चार, झाडगाव सहा, कळंब तालुक्यातील तिरझडा येथे आठ, कळंब सात, कोठा सहा, परसोडी तीन, अंतरगाव तीन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचा महसूल विभागाचा अहवाल आहे. या सर्व फक्त पात्र शेतकरी आत्महत्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे यामागे असल्याचा शासनाचा अहवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत आमदारांना प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन गावे २०१९ पर्यंत आदर्श करावयाची आहे. त्यासाठी गावांची शिफारस आमदारांकडून शासनाने मागितली आहे. खैरी ३५२८, दहेगाव २२०२, कळंब तालुक्यातील तिरझडा १८०० याप्रमाणे लोकसंख्या असलेल्या शेतकरी आत्महत्येने पीडित आणि जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या या गावांची निवड करून येथील लोकांना दिलासा आणि मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी आमदार आदर्श गाव योजना संजीवनी ठरू शकते.