शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 12:22 IST

टिपेश्वरचा प्रस्ताव धूळखात; पर्यटनाला अशाने चालना मिळणार का?

नरेश मानकर

पांढरकवडा (यवतमाळ) : टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघांची संख्या वाढत आहे. सध्या या भागात १६ पेक्षा अधिक वाघ असून, त्यांना पाहण्यासाठी पर्यटकही भेटी देत आहेत. वन्यप्राण्यांची सुरक्षा व पर्यटनाला चालना देण्यासाठी या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे; परंतु यासाठीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. शासन याबाबतचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नागपूर-हैदराबाद, या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर टिपेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात १६ पेक्षा अधिक पट्टेदार वाघ असून, ही संख्या सतत वाढत असल्याने वाघ अभयारण्याबाहेर येत आहेत. पर्यायाने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वाघांनी आतापर्यंत १६ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली आहे. अभयारण्याबाहेर येणारे हे वाघ शेतकऱ्यांचे टार्गेट असतात. अनेकदा सापळे लावून त्यांची शिकार केली जाते किंवा पिकाच्या संरक्षणासाठी कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन या वाघांचा मृत्यू होतो.

हे प्रकार टाळले जावेत, तसेच पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या अभयारण्याला सध्या केंद्रीय वनखात्याचे नियम लागू नाहीत. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास केंद्राचे आणि पर्यटनाचे नियम लागू होतील. त्यातूनच विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. या ठिकाणी वाघांची संख्या वाढायला भरपूर वाव आहे. कोअरझोन, बफरझोन निर्माण केले जात असल्याने वनयंत्रणेची गस्त मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यातूनच शिकाऱ्यांपासून वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे.

पूर्वी टिपेश्वरचे नियंत्रण हे पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे होते. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले आहे. भाजप-सेना युती सरकारमध्ये महसूल विभागनिहाय नियंत्रणाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानुसार टिपेश्वरचे नियंत्रण अमरावती महसूल विभागातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मार्गी लागण्याची अपेक्षा होती; परंतु अद्यापही धूळखात पडलेला आहे.

पर्यटन वाढीसोबतच रोजगारही वाढेल

१३१.८१ चौरस किलोमीटर कार्यक्षेत्र असलेला वर्धा जिल्ह्यातील बोर हा देशातील सध्याचा सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र १४८.६३ चौरस किलोमीटर आहे. छोट्या अभयारण्यालाही व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देणे शक्य असल्याचे यातून स्पष्ट होते. म्हणूनच टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी सतत होत आहे. टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प झाल्यास पर्यटन वाढण्यासोबतच बेरोजगार युवकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघtourismपर्यटनYavatmalयवतमाळ