शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जादा तूर विक्रीची चौकशी

By admin | Updated: March 31, 2017 02:15 IST

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापारीच तूर विकत असल्याचा धक्कादायक प्रकार येथील बाजार समितीत उघड झाला.

फौजदारी दाखल करा : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देशयवतमाळ : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापारीच तूर विकत असल्याचा धक्कादायक प्रकार येथील बाजार समितीत उघड झाला. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत क्षमतेपेक्षा जादा तूर विक्री करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापाऱ्यांनी तुरी विकल्याचे खुद्द येथील बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी उघड केले. याबाबत एकाच टोकनवर तीन लिलाव झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियमबाह्य विक्रीला चाप लावण्यासाठी ठोस निर्णय घेतले. त्यानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रांना त्यांनी १० क्विंटलपेक्षा जादा तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधकांकडे ३० मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. सहाय्यक निबंधकाकडे जादा तूर विक्रीबाबत प्रथम सुनावणी होईल. ते सातबारा, आठ अ, पेरेपत्रक, आधार कार्डची तपासणी करतील. त्यात शेतकऱ्याने क्षमतेपेक्षा जादा तूर विकल्याचे सिद्ध झाल्यास, त्यांच्याविरूद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहे.शासकीय तूर खरेदी केंद्रांवरील हेराफेरी थांबविण्याची जबाबदारी आता सहाय्यक निबंधकांकडे देण्यात आली. त्यांना केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही दिल्या. यासोबत वितरित झालेल्या टोकन नंबरनुसार खरेदी होत आहे का, एकाच टोकनवर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यात आला का, याची पाहणी करण्यात येणार आहे. खरेदी होणारी तूर पात्र आहे का, शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी येत आहेत का, याबद्दलही माहिती जाणून घेतली जाणार आहे. यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर) १६ हजार शेतकरी प्रतीक्षेत१५ एप्रिलपर्यंतच तूर खरेदी होणार आहे. दरम्यानच्या काळात अनेकदा केंद्र ठप्प पडले. त्यामुळे तूर खरेदी रखडली होती. यामुळे प्रत्येक केंद्रावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेली तूर १५ एप्रिलपर्यंत खरेदी होणार किंवा नाही, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडला आहे. १५ दिवसांत १५ केंद्रांवर १६ हजारपेक्षा अधिक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.