शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बैलबाजारात ग्राहक मोजके अन् विक्रेते अधिक

By admin | Updated: May 16, 2016 02:42 IST

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला.

प्रकाश सातघरे ल्ल दिग्रस दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला. जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसत होती. मात्र खरीददार फिरकत नव्हते. यामुळे जनावरांचे दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दिग्रस येथील बैलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दर शनिवारी येथे बैलबाजार भरतो. गत आठवड्यातील बैलबाजारात कधी नव्हे एवढी जनावरांची संख्या दिसून आली. यातही सर्वाधिक जनावरे शेतकऱ्यांची असल्याचे सांगण्यात आले. दिग्रस तालुक्यात गत तीन वर्षांपासून भीषण टंचाई आहे. या परिस्थितीने शेतकऱ्यांसोबत पशुपालकही त्रस्त झाले आहे. आता तर गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून विहिरीत पाण्याचा थेंब नाही. माणसांना पाणी मिळत नाही तर जनावरांचे काय असा प्रश्न आहे. जनावरांचे हाल डोळ्याने पहावत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता जनावरे विक्रीस काढली आहे. त्यामुळेच शनिवारच्या बैलबाजारात मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली होती. बाजारात विक्रेत्यांची संख्या अधिक असली तरी खरेदीदार मात्र अत्यल्प आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर या जनावरांची खरेदी थांबली आहे. परिणामी जनावरांचे दरही कमी झाले आहे. ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्याला गावावरून बाजारापर्यंत जनावरांना आणण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास डोळ्यादेखत जनावरांना मरताना पाहण्याची वेळ येऊ शकते. या जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे. ८० हजाराची बैलजोडी ४० हजारात दिग्रसच्या बैलबाजारात जनावरांचे भाव घसरले आहे. त्या मागचे कारण म्हणजे ग्राहक मोजके आणि विक्रेते अधिक अशी परिस्थिती आहे. ७० ते ८० हजार रुपये किंमत असलेल्या बैलांची जोडी केवळ ४० ते ५० हजार रुपयात विकली जाते. अशीच अवस्था गाई आणि म्हशींची आहे. पाण्याची व्यवस्था नाही, चारा नाही, यामुळे नाईलाजाने जनावरे विकावे लागत आहे. परंतु बाजारातही खरेदीदार कुणी नाही. जनावर उपाशी मरु देऊ शकत नाही आणि बाजारात विकल्या जात नाही. अशा धर्मसंकटात आम्ही सापडलो आहोत. - महादेव भालेरावपशुपालक फेट्री ता. दिग्रस