शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

बैलबाजारात ग्राहक मोजके अन् विक्रेते अधिक

By admin | Updated: May 16, 2016 02:42 IST

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला.

प्रकाश सातघरे ल्ल दिग्रस दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला. जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसत होती. मात्र खरीददार फिरकत नव्हते. यामुळे जनावरांचे दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दिग्रस येथील बैलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दर शनिवारी येथे बैलबाजार भरतो. गत आठवड्यातील बैलबाजारात कधी नव्हे एवढी जनावरांची संख्या दिसून आली. यातही सर्वाधिक जनावरे शेतकऱ्यांची असल्याचे सांगण्यात आले. दिग्रस तालुक्यात गत तीन वर्षांपासून भीषण टंचाई आहे. या परिस्थितीने शेतकऱ्यांसोबत पशुपालकही त्रस्त झाले आहे. आता तर गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून विहिरीत पाण्याचा थेंब नाही. माणसांना पाणी मिळत नाही तर जनावरांचे काय असा प्रश्न आहे. जनावरांचे हाल डोळ्याने पहावत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता जनावरे विक्रीस काढली आहे. त्यामुळेच शनिवारच्या बैलबाजारात मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली होती. बाजारात विक्रेत्यांची संख्या अधिक असली तरी खरेदीदार मात्र अत्यल्प आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर या जनावरांची खरेदी थांबली आहे. परिणामी जनावरांचे दरही कमी झाले आहे. ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्याला गावावरून बाजारापर्यंत जनावरांना आणण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास डोळ्यादेखत जनावरांना मरताना पाहण्याची वेळ येऊ शकते. या जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे. ८० हजाराची बैलजोडी ४० हजारात दिग्रसच्या बैलबाजारात जनावरांचे भाव घसरले आहे. त्या मागचे कारण म्हणजे ग्राहक मोजके आणि विक्रेते अधिक अशी परिस्थिती आहे. ७० ते ८० हजार रुपये किंमत असलेल्या बैलांची जोडी केवळ ४० ते ५० हजार रुपयात विकली जाते. अशीच अवस्था गाई आणि म्हशींची आहे. पाण्याची व्यवस्था नाही, चारा नाही, यामुळे नाईलाजाने जनावरे विकावे लागत आहे. परंतु बाजारातही खरेदीदार कुणी नाही. जनावर उपाशी मरु देऊ शकत नाही आणि बाजारात विकल्या जात नाही. अशा धर्मसंकटात आम्ही सापडलो आहोत. - महादेव भालेरावपशुपालक फेट्री ता. दिग्रस