शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चंदनाची किमया, १०० कोटींची माया

By admin | Updated: July 3, 2015 00:17 IST

शिक्षणाचा संबंध नोकरी आणि संपत्ती कमावण्यासाठी जोडला जातो. मात्र भरपूर संपत्ती कमावण्यासाठी शिक्षण आवश्यकच असते,...

परिश्रमाचा सुगंध : महेंद्र घागरे करतोय चंदन लागवडीचा प्रसार काशीनाथ लाहोरे  यवतमाळ शिक्षणाचा संबंध नोकरी आणि संपत्ती कमावण्यासाठी जोडला जातो. मात्र भरपूर संपत्ती कमावण्यासाठी शिक्षण आवश्यकच असते, ही संकल्पना मोडीत काढणारी ही एक सत्यकथा. इयत्ता चौथी उत्तीर्ण माणूस किती पैसा कमावू शकतो याचा अंदाजही कोलमडून टाकणारा एकेकाळचा उपेक्षित परंतु आजचा यशस्वी उद्योजक म्हणजे पुणे जिल्ह्यातील दौंड येथील महेंद्र घागरे होय. चंदनरोप विक्रीच्या व्यवसायातून महेंद्र १०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक झाला. यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात चंदन लागवडीवर आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्र घागरे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली यशोगाथा सांगितली. शिक्षण नाही, कोणतेही कौशल्य नाही, जवळ पैसाही नाही, नोकरी, कामधंदा तर दूरच परिणामी नातेवाईकांच्या दृष्टीकोनातून अत्यंत बेकार माणूस. एके दिवशी एसटी बसमधून प्रवास करताना सागाची मुळे (स्टम्प) विकणारा शेतकरी भेटला. त्याच्याकडून माहिती घेतली. १९८५ पासून एका स्टम्पमागे ३० पैसे नफा घेऊन महेंद्रने व्यवसाय सुरू केला. त्यानंतर चार लाख रोपांची नर्सरी तयार केली. परंतु गिऱ्हाईक फिरके ना. ‘या वर्षी शेवटी यावर्षी रोपे न्या, पुढच्या वर्षी पैसे द्या’ अशी जाहिरात दिल्यावर रोपे विकल्या गेली. जशी अडचण येईल तशी उधारी वसूल केली. व्यवसाय वाढला, एक लाख रुपये महिना मिळू लागला. सागाबरोबर पुढे बंगलोर येथील चंदन संशोधन संस्थे जाऊन त्याची शास्त्रोक्त माहिती घेतली आणि चंदनाबाबतचे सगळे गैरसमज स्वप्रयत्नाने दूर करून चंदनाची रोपे विकायला प्रारंभ केला. आज घडीला महेंद्रची संपत्ती १०० कोटींची आहे. ज्या समाजाने, राष्ट्राने, पर्यावरणाने, वृक्षाने ही संपत्ती दिली, ते पाहून सर्वच आश्चर्यचकीत होतात. स्वत: त्यांचाही यावर कधीकधी विश्वास बसत नाही. पैशाची हाव अनेकांना मरेपर्यंत सुटत नाही. मात्र चौथा वर्ग शिकलेल्या या माणसाने पैशाचा मोह टाळत आता पर्यावरणासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून कोल्हापूर विद्यापीठाने त्यांना सिनेट सदस्यत्व बहाल केले. अशा या आगळ्या वेगळ्या पर्यावरण प्रेमीने यवतमाळात येऊन येथील शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी प्रवृत्त केले.