शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मान्सून लांबला, चिंता वाढली

By admin | Updated: June 15, 2016 02:43 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला.

अर्धा मृग कोरडा : नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली यवतमाळ : हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. संपूर्ण रोहिणी आणि अर्धे मृगनक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून आणखी काही दिवस लांबण्याचे संकेत हवामान खात्याने पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी नऊ लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली असून पाणी टंचाईचीही तीव्रताही जिल्ह्यात कायमच आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाचा मारा झेलत आहे. नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात आशेचा किरण दाखविला. राज्यासह विदर्भात वार्षिक सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. परंतु मान्सूनचे आगमन लांबले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खाते सांगत आहे. विदर्भात अद्यापही पावसाळी वातावरण तयार झाले नाही. जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु तेही काही तालुक्यापुरताच मर्यादित होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्यात मान्सून बरसतो. शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागतो. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. यंदाही असेच चित्र सध्या दिसत आहे. रोहिणी आणि अर्धा मृग संपला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आतापर्यंत ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ तीन टक्के आहे. मुबलक पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. मात्र ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी झाली असून त्यात कपाशीची सर्वाधिक लागवड आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असा सल्ला कृषी खाते देत आहे. हवामान खाते, स्कायमेटने यंदा पाऊस वेळेवर येईल असे भाकित वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळाच्या नैराश्यातून शेतकरी बाहेर पडला. मोठ्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला. बँकात जाऊन पीक कर्जासाठी धडपड करू लागला. अवकाळी पाऊस कोसळल्याने आशा पल्लवीत झाल्या. कृषी केंद्रात बियाण्यांची चाचपणी सुरू झाले. परंतु १४ जूनपर्यंतही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)