शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

मान्सून लांबला, चिंता वाढली

By admin | Updated: June 15, 2016 02:43 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला.

अर्धा मृग कोरडा : नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली यवतमाळ : हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. संपूर्ण रोहिणी आणि अर्धे मृगनक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून आणखी काही दिवस लांबण्याचे संकेत हवामान खात्याने पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी नऊ लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली असून पाणी टंचाईचीही तीव्रताही जिल्ह्यात कायमच आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाचा मारा झेलत आहे. नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात आशेचा किरण दाखविला. राज्यासह विदर्भात वार्षिक सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. परंतु मान्सूनचे आगमन लांबले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खाते सांगत आहे. विदर्भात अद्यापही पावसाळी वातावरण तयार झाले नाही. जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु तेही काही तालुक्यापुरताच मर्यादित होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्यात मान्सून बरसतो. शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागतो. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. यंदाही असेच चित्र सध्या दिसत आहे. रोहिणी आणि अर्धा मृग संपला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आतापर्यंत ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ तीन टक्के आहे. मुबलक पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. मात्र ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी झाली असून त्यात कपाशीची सर्वाधिक लागवड आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असा सल्ला कृषी खाते देत आहे. हवामान खाते, स्कायमेटने यंदा पाऊस वेळेवर येईल असे भाकित वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळाच्या नैराश्यातून शेतकरी बाहेर पडला. मोठ्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला. बँकात जाऊन पीक कर्जासाठी धडपड करू लागला. अवकाळी पाऊस कोसळल्याने आशा पल्लवीत झाल्या. कृषी केंद्रात बियाण्यांची चाचपणी सुरू झाले. परंतु १४ जूनपर्यंतही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)