शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबला, चिंता वाढली

By admin | Updated: June 15, 2016 02:43 IST

हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला.

अर्धा मृग कोरडा : नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली यवतमाळ : हवामान खात्याने वर्तविलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुरुवातीला सुखावला होता. जसजसा पावसाळा जवळ आला तसतसा हवामानाचा अंदाजही बदलत गेला. संपूर्ण रोहिणी आणि अर्धे मृगनक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून आणखी काही दिवस लांबण्याचे संकेत हवामान खात्याने पुन्हा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी नऊ लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली असून पाणी टंचाईचीही तीव्रताही जिल्ह्यात कायमच आहे. जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांपासून दुष्काळाचा मारा झेलत आहे. नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांना यावर्षी हवामान खात्याने मे महिन्यात आशेचा किरण दाखविला. राज्यासह विदर्भात वार्षिक सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. परंतु मान्सूनचे आगमन लांबले. आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे हवामान खाते सांगत आहे. विदर्भात अद्यापही पावसाळी वातावरण तयार झाले नाही. जिल्ह्यात गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परंतु तेही काही तालुक्यापुरताच मर्यादित होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्यात मान्सून बरसतो. शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागतो. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून पाऊस सतत हुलकावणी देत आहे. यंदाही असेच चित्र सध्या दिसत आहे. रोहिणी आणि अर्धा मृग संपला तरी जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आतापर्यंत ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ तीन टक्के आहे. मुबलक पाऊस नसल्याने जिल्ह्यात सर्वत्र पेरण्या खोळंबल्याचे दिसत आहे. मात्र ओलिताची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी झाली असून त्यात कपाशीची सर्वाधिक लागवड आहे. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असा सल्ला कृषी खाते देत आहे. हवामान खाते, स्कायमेटने यंदा पाऊस वेळेवर येईल असे भाकित वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळाच्या नैराश्यातून शेतकरी बाहेर पडला. मोठ्या उमेदीने खरिपाच्या तयारीला लागला. बँकात जाऊन पीक कर्जासाठी धडपड करू लागला. अवकाळी पाऊस कोसळल्याने आशा पल्लवीत झाल्या. कृषी केंद्रात बियाण्यांची चाचपणी सुरू झाले. परंतु १४ जूनपर्यंतही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)