शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

आई गेली, बाबा गेले... डोळ्यात आले पाणी !

By admin | Updated: April 20, 2016 02:42 IST

पाण्यासाठी भटकंती आता नित्याची झालेली असताना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र ही टंचाई जीवघेणी ठरत आहे.

पाण्यासाठी दाम्पत्याचा मृत्यू : वडगाव तांडा येथील भीषण पाणीटंचाईमुळे तीन चिमुकल्यांचे भविष्य अधांतरी राजेश कुशवाह आर्णीपाण्यासाठी भटकंती आता नित्याची झालेली असताना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र ही टंचाई जीवघेणी ठरत आहे. वडगाव तांडा येथे पाणी भरण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीचा विहिरीत बुडून करुण अंत झाला. घोटभर पाण्यासाठी गेलेले आई-वडील कायमचेच गेल्याने त्यांची तीन चिमुकली लेकरे मात्र पोरकी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतरही तालुक्यातील पाणीटंचाईवर ठोस पाऊल उचलण्यासाठी प्रशासनात हालचालीचा पत्ता नाही.आर्णीपासून जवळच असलेल्या वडगाव तांडा येथील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १७ एप्रिल रोजी गावापासून काही अंतरावरील एका विहिरीवर मोनिका माणिक जाधव आणि माणिक प्रेमसिंग जाधव हे पती-पत्नी गेले होते. मात्र खोल विहिरीतून पाणी काढताना त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. वडगाव तांडा वडगाव(गाढवे) गटग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. गेल्या महिनाभरापासून पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष येथे निर्माण झाले आहे. ८०० लोकवस्ती असलेल्या वडगाव तांडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. परंतु विहिरी आणि हातपंप पूर्णत: कोरडे पडले आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही. अशा परिस्थीतीत रोजमजुरी करून जगणाऱ्या मोनिका आणि माणिक जाधव या दाम्पत्याला एका शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत होते. रविवारी त्यांनी आपल्या मुलांना पाणी आणायला जातो, असे सांगितले. जगदीश कणिराम राठोड यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरताना मात्र घात झाला आणि दोघांचाही मृत्यू ओढवला. मोनिका पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी माणिकनेही उडी घेतली. पण दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे जीव गेला. पाण्यासाठी जीव गमाविणाऱ्या या मजूर दाम्पत्याच्या मागे कोमल (वय ७), बजरंग (वय ४) आणि प्रीतम ही चिमुकली तीन अपत्ये आहेत. त्यांच्या डोक्यावरून अचानक आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांचा हंबरडा गावकऱ्यांना हादरवून सोडणारा होता. ही तीनही मुले आई-बाबा पाणी घेऊन येणार म्हणून वाट पाहात होती. लहान मुलांचे रडणे पाहून मृत मोनिकाची जाऊ विहिरीकडे गेली असता तिला दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळले. सासू-सासऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कोमल पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर प्रीतम व बजरंग तिच्यापेक्षाही लहान आहे. घरात हलाखी असताना आई-वडील हरविल्याने या मुलांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे वडगाव तांडा येथे दोन बळी गेले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. दोन जीव गेलेल्या वडगाव तांडा या गावातील पाणीटंचाईवर विचार करताना आता तरी प्रशासनाने कोरडेपणा दाखवू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.