शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

आई गेली, बाबा गेले... डोळ्यात आले पाणी !

By admin | Updated: April 20, 2016 02:42 IST

पाण्यासाठी भटकंती आता नित्याची झालेली असताना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र ही टंचाई जीवघेणी ठरत आहे.

पाण्यासाठी दाम्पत्याचा मृत्यू : वडगाव तांडा येथील भीषण पाणीटंचाईमुळे तीन चिमुकल्यांचे भविष्य अधांतरी राजेश कुशवाह आर्णीपाण्यासाठी भटकंती आता नित्याची झालेली असताना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र ही टंचाई जीवघेणी ठरत आहे. वडगाव तांडा येथे पाणी भरण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीचा विहिरीत बुडून करुण अंत झाला. घोटभर पाण्यासाठी गेलेले आई-वडील कायमचेच गेल्याने त्यांची तीन चिमुकली लेकरे मात्र पोरकी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतरही तालुक्यातील पाणीटंचाईवर ठोस पाऊल उचलण्यासाठी प्रशासनात हालचालीचा पत्ता नाही.आर्णीपासून जवळच असलेल्या वडगाव तांडा येथील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १७ एप्रिल रोजी गावापासून काही अंतरावरील एका विहिरीवर मोनिका माणिक जाधव आणि माणिक प्रेमसिंग जाधव हे पती-पत्नी गेले होते. मात्र खोल विहिरीतून पाणी काढताना त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. वडगाव तांडा वडगाव(गाढवे) गटग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. गेल्या महिनाभरापासून पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष येथे निर्माण झाले आहे. ८०० लोकवस्ती असलेल्या वडगाव तांडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. परंतु विहिरी आणि हातपंप पूर्णत: कोरडे पडले आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही. अशा परिस्थीतीत रोजमजुरी करून जगणाऱ्या मोनिका आणि माणिक जाधव या दाम्पत्याला एका शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत होते. रविवारी त्यांनी आपल्या मुलांना पाणी आणायला जातो, असे सांगितले. जगदीश कणिराम राठोड यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरताना मात्र घात झाला आणि दोघांचाही मृत्यू ओढवला. मोनिका पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी माणिकनेही उडी घेतली. पण दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे जीव गेला. पाण्यासाठी जीव गमाविणाऱ्या या मजूर दाम्पत्याच्या मागे कोमल (वय ७), बजरंग (वय ४) आणि प्रीतम ही चिमुकली तीन अपत्ये आहेत. त्यांच्या डोक्यावरून अचानक आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांचा हंबरडा गावकऱ्यांना हादरवून सोडणारा होता. ही तीनही मुले आई-बाबा पाणी घेऊन येणार म्हणून वाट पाहात होती. लहान मुलांचे रडणे पाहून मृत मोनिकाची जाऊ विहिरीकडे गेली असता तिला दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळले. सासू-सासऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कोमल पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर प्रीतम व बजरंग तिच्यापेक्षाही लहान आहे. घरात हलाखी असताना आई-वडील हरविल्याने या मुलांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे वडगाव तांडा येथे दोन बळी गेले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. दोन जीव गेलेल्या वडगाव तांडा या गावातील पाणीटंचाईवर विचार करताना आता तरी प्रशासनाने कोरडेपणा दाखवू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.